शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

गारपिटीचा तडाखा : अकोला जिल्हय़ातील २७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:58 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देजिल्हय़ातील पाच तालुक्यांत १८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.गत ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करून १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला होता. त्यानुषंगाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या  पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसानाचे अहवाल तहसीलदारांमार्फत १९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकर्‍यांचे १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले गारपीटग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

शासनाकडे आज  अहवाल पाठविणार !अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकरी आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानाचे क्षेत्र इत्यादी माहितीचा समावेश आहे.

दोन तालुक्यांत नुकसानच नाही! अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत पिकांचे नुकसानच नाही. तसेच तेल्हारा तालुक्यात केवळ एका शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी