शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

गारपिटीचा तडाखा : अकोला जिल्हय़ातील २७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:58 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देजिल्हय़ातील पाच तालुक्यांत १८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.गत ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करून १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला होता. त्यानुषंगाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या  पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसानाचे अहवाल तहसीलदारांमार्फत १९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकर्‍यांचे १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले गारपीटग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

शासनाकडे आज  अहवाल पाठविणार !अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकरी आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानाचे क्षेत्र इत्यादी माहितीचा समावेश आहे.

दोन तालुक्यांत नुकसानच नाही! अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत पिकांचे नुकसानच नाही. तसेच तेल्हारा तालुक्यात केवळ एका शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी