शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

गारपिटीचा तडाखा : अकोला जिल्हय़ातील २७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:58 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देजिल्हय़ातील पाच तालुक्यांत १८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.गत ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करून १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला होता. त्यानुषंगाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या  पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसानाचे अहवाल तहसीलदारांमार्फत १९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकर्‍यांचे १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले गारपीटग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

शासनाकडे आज  अहवाल पाठविणार !अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकरी आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानाचे क्षेत्र इत्यादी माहितीचा समावेश आहे.

दोन तालुक्यांत नुकसानच नाही! अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत पिकांचे नुकसानच नाही. तसेच तेल्हारा तालुक्यात केवळ एका शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी