शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

 पातूर, बार्शीटाकळीची भूजल पातळी एक मीटरने वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 10:47 AM

Groundwater level Akola बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत १ मीटरने वाढ झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे यंदा टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी हाेण्याची चिन्हे आहेत.सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत माेठी वाढ झाली आहे.

अकाेला : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, तसेच सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत माेठी वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी हाेण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात एकूण ३८ पाणलोट क्षेत्र असून, त्यामधील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे ८१ निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. यावर्षी ऑक्टोबर अखेर घेण्यात आलेल्या भूजल पातळीच्या नोंदीचा आणि मागील ५ वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत १ मीटरने वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत ०.२५ ते ०.७० मी. ने वाढ झालेली दिसून येते; परंतु असे असले तरी, सन २०१७ च्या भूजल मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील ३८ पाणलोट क्षेत्रांपैकी ११ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा उपसा पुनर्भरणाच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि एका पाणलोट क्षेत्रात (पीटीएमटी-१ पातूर तालुका) १०० टक्क्यापेक्षा जास्त आहे. या १२ पाणलोट क्षेत्रात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे व उपस्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

या कारणांमुळे वाढली भूजल पातळी

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत झालेली वाढ भूजल पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे तसेच या पावसामुळे शेतातील ओल कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही आणि यावर्षी दोन पावसातील खंड दिसून आला नाही.

या वर्षात झालेला मुबलक पाऊस व खरिपाच्या हंगामात न झालेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळीमध्ये माेठी वाढ दिसून येत आहे

- संजय कराड , वरिष्ठ भूवैज्ञानिक.

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी