वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:48+5:302021-05-07T04:19:48+5:30

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची ...

Groundnut and onion crops are endangered due to wildlife | वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची राखणदारी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच रात्रंदिवस मुक्काम करण्याची वेळ आली आहे. परिसरात नीलगाय, हरणांचे कळप, रानडुकरे मोठ्या प्रमाणात असून, शेतातील पिकांमध्ये शिरून नुकसान करीत आहेत. याबाबत वन व वन्यजीव विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु वनविभागाने दखल घेतली नाही. रानडुकरे अचानक हल्ला करीत असल्याने, शेतातील पिकांच्या रखवाली करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रंदिवस मुक्काम करून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पिकांची राखणदारी करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पिकांची रक्षण करण्याठी रात्रीला शेतात मुक्काम करावा लागत आहे.

-अनंता रामराव काळे, शेतकरी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.

-प्रवीण सुरेश लोखंडे, शेतकरी वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला असून, पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे रात्रीला शेतात मुक्कामाला जावे लागत आहे. वन्य प्राण्यांनी पिकांची नासधूस केल्यानंतरही वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही.

-पुरुषोत्तम दुतोंडे,

शेतकरी बेलुरा

Web Title: Groundnut and onion crops are endangered due to wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.