शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:03 IST

अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे.

 - राजेश शेगोकारअकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे. यामध्ये अकोल्याची एकमेव जागा भारिप-बमसंसाठी तर बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या सहा जागांच्या दाव्यालाही वाटण्याच्या अक्षता लावल्याची माहिती आहे. जागा वाटपासंदर्भातील चर्चा सध्या पश्चिम वºहाडच्या राजकारणात रंगत असल्याने जागा वाटपाच्या मुद्यावरच महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, डावे पक्ष यांचा समावेश आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही आघाडीत समावेश व्हावा, यासाठी दोन्ही काँग्रेसने जाहीरपणे अनुकूलता दाखविली आहे; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत केलेल्या संगतीमुळे त्यांचा महाआघाडीतील प्रवेशाचा मार्ग थांबल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीचे जागा वाटप ठरविले असून, त्यामध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडल्या जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अ‍ॅड. आंबेडकरांनी आधीच १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे अवघ्या एका जागेसाठी ते महाआघाडीसोबत जातील, ही शक्यताच मावळली आहे. दुसरीकडे महाआघाडीत प्रवेशासाठी ‘एमआयएम’ला सोडण्याची काँग्रेसची अट त्यांना मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे, त्यामुळे तसेही त्यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्टच झाले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागा मागितल्या असल्या, तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत ते आग्रही आहेत. अशा स्थितीत स्वाभिमानीला राजू शेट्टींसाठी हातकणंगले हा एकच मतदारसंघ सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीने दाखविलेली तयारी स्वाभिमानीला मान्य होणार नाही. त्यामुळे हे संभाव्य जागा वाटप महाआघाडीत बिघाडीचे आतापासूनच बीजारोपण करीत असल्याचे दिसत आहे.‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे लक्षस्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे चार मतदारसंघ मागितले आहेत, त्यामध्ये विदर्भातील बुलडाणा व वर्धा हे दोन मतदारसंघ आहेत. राजू शेट्टी गेल्यावेळी महायुतीमध्ये सहभागी असताना त्यांना त्यांच्या मतदारसंघासोबतच माढा हा मतदारसंघ दिला होता. तेच सूत्र महाआघाडीत कायम राहिले, तर त्यांना आणखी एक मतदारसंघ कदाचित मिळेल, त्यामुळे वर्ध्यासाठी माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यासाठी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यापैकी कोणासाठी ते आग्रही राहतील, यावरच या मोहिते व तुपकरांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना