शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:03 IST

अकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे.

 - राजेश शेगोकारअकोला: भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या महाआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून, मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली आहे. यामध्ये अकोल्याची एकमेव जागा भारिप-बमसंसाठी तर बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या सहा जागांच्या दाव्यालाही वाटण्याच्या अक्षता लावल्याची माहिती आहे. जागा वाटपासंदर्भातील चर्चा सध्या पश्चिम वºहाडच्या राजकारणात रंगत असल्याने जागा वाटपाच्या मुद्यावरच महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप, डावे पक्ष यांचा समावेश आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही आघाडीत समावेश व्हावा, यासाठी दोन्ही काँग्रेसने जाहीरपणे अनुकूलता दाखविली आहे; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत केलेल्या संगतीमुळे त्यांचा महाआघाडीतील प्रवेशाचा मार्ग थांबल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीचे जागा वाटप ठरविले असून, त्यामध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा सोडल्या जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अ‍ॅड. आंबेडकरांनी आधीच १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यामुळे अवघ्या एका जागेसाठी ते महाआघाडीसोबत जातील, ही शक्यताच मावळली आहे. दुसरीकडे महाआघाडीत प्रवेशासाठी ‘एमआयएम’ला सोडण्याची काँग्रेसची अट त्यांना मान्य नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे, त्यामुळे तसेही त्यांच्या महाआघाडीतील प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्टच झाले आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहा जागा मागितल्या असल्या, तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत ते आग्रही आहेत. अशा स्थितीत स्वाभिमानीला राजू शेट्टींसाठी हातकणंगले हा एकच मतदारसंघ सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीने दाखविलेली तयारी स्वाभिमानीला मान्य होणार नाही. त्यामुळे हे संभाव्य जागा वाटप महाआघाडीत बिघाडीचे आतापासूनच बीजारोपण करीत असल्याचे दिसत आहे.‘स्वाभिमानी’च्या निर्णयाकडे लक्षस्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे चार मतदारसंघ मागितले आहेत, त्यामध्ये विदर्भातील बुलडाणा व वर्धा हे दोन मतदारसंघ आहेत. राजू शेट्टी गेल्यावेळी महायुतीमध्ये सहभागी असताना त्यांना त्यांच्या मतदारसंघासोबतच माढा हा मतदारसंघ दिला होता. तेच सूत्र महाआघाडीत कायम राहिले, तर त्यांना आणखी एक मतदारसंघ कदाचित मिळेल, त्यामुळे वर्ध्यासाठी माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यासाठी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यापैकी कोणासाठी ते आग्रही राहतील, यावरच या मोहिते व तुपकरांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना