शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

By admin | Updated: February 17, 2016 02:20 IST

ग्रंथोत्सवातील परिसंवादात उमटला सूर.

अकोला: मनुष्याच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा पडत असेल, तर वाचनाचा. एकदा नातेवाईक आपली साथ सोडतील, पण ग्रंथ हे आपल्याला सतत काही ना काही मार्गदर्शन करतात. यशाचं शिखर गाठायचं असेल, तर ज्ञान आवश्यक आहे आणि ते मिळवायचं असेल, तर वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून वाचनालय हे मंदिर व ग्रंथ हे दैवत मानले, तर प्रसादरूपी यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रंथाने मला काय दिले? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुहास कुळकर्णी (बाबूजी) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे व डॉ. किरण वाघमारे उपस्थित होते. परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना प्रा. संजय खडसे म्हणाले की, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ग्रंथ आणि पुस्तके करीत असतात. या ग्रंथरूपी गुरूमुळेच आज मी तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी एसडीओ म्हणून सर्वांसमक्ष उभा आहे. माझा हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी मी घालवतो. यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे म्हणाल्या की, पुस्तक वाचणे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न असतो. जीवनावर ग्रंथांचा प्रभाव पडतो म्हणजे काय, तर वाचन करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल. पुस्तक हातात घेतले की, आपली मानसिकता बदलते व आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लागतो. आपले विचार व्यक्त करताना डॉ. किरण वाघमारे म्हणाले की, ग्रंथ हे जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करीत असतात. जीवनातील अडचणीच्या काळात ग्रंथप्रेम कसे जपले, याबाबत त्यांनी आपला अनुभव कथन केले. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर सदैव अपडेट राहणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुहास कुळकर्णी म्हणाले की, ग्रंथांमुळे मनाची कवाडे उघडतात. शिल्पकार जशी मूर्ती घडवितो, त्याच पद्धतीने ग्रंथ आपले जीवन घडविण्यास कारणीभूत ठरतात. वेदांचा वेद तेव्हाच कळतो, जेव्हा वेदना कळतात. त्या वेदना उमजण्याचे सार्मथ्य ग्रंथांच्या वाचनामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार श्यामराव वाहूरवाघ यांनी मानले.