शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

By admin | Updated: February 17, 2016 02:20 IST

ग्रंथोत्सवातील परिसंवादात उमटला सूर.

अकोला: मनुष्याच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा पडत असेल, तर वाचनाचा. एकदा नातेवाईक आपली साथ सोडतील, पण ग्रंथ हे आपल्याला सतत काही ना काही मार्गदर्शन करतात. यशाचं शिखर गाठायचं असेल, तर ज्ञान आवश्यक आहे आणि ते मिळवायचं असेल, तर वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून वाचनालय हे मंदिर व ग्रंथ हे दैवत मानले, तर प्रसादरूपी यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रंथाने मला काय दिले? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुहास कुळकर्णी (बाबूजी) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे व डॉ. किरण वाघमारे उपस्थित होते. परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना प्रा. संजय खडसे म्हणाले की, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ग्रंथ आणि पुस्तके करीत असतात. या ग्रंथरूपी गुरूमुळेच आज मी तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी एसडीओ म्हणून सर्वांसमक्ष उभा आहे. माझा हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी मी घालवतो. यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे म्हणाल्या की, पुस्तक वाचणे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न असतो. जीवनावर ग्रंथांचा प्रभाव पडतो म्हणजे काय, तर वाचन करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल. पुस्तक हातात घेतले की, आपली मानसिकता बदलते व आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लागतो. आपले विचार व्यक्त करताना डॉ. किरण वाघमारे म्हणाले की, ग्रंथ हे जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करीत असतात. जीवनातील अडचणीच्या काळात ग्रंथप्रेम कसे जपले, याबाबत त्यांनी आपला अनुभव कथन केले. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर सदैव अपडेट राहणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुहास कुळकर्णी म्हणाले की, ग्रंथांमुळे मनाची कवाडे उघडतात. शिल्पकार जशी मूर्ती घडवितो, त्याच पद्धतीने ग्रंथ आपले जीवन घडविण्यास कारणीभूत ठरतात. वेदांचा वेद तेव्हाच कळतो, जेव्हा वेदना कळतात. त्या वेदना उमजण्याचे सार्मथ्य ग्रंथांच्या वाचनामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार श्यामराव वाहूरवाघ यांनी मानले.