शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

By admin | Updated: February 17, 2016 02:20 IST

ग्रंथोत्सवातील परिसंवादात उमटला सूर.

अकोला: मनुष्याच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा पडत असेल, तर वाचनाचा. एकदा नातेवाईक आपली साथ सोडतील, पण ग्रंथ हे आपल्याला सतत काही ना काही मार्गदर्शन करतात. यशाचं शिखर गाठायचं असेल, तर ज्ञान आवश्यक आहे आणि ते मिळवायचं असेल, तर वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून वाचनालय हे मंदिर व ग्रंथ हे दैवत मानले, तर प्रसादरूपी यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रंथाने मला काय दिले? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुहास कुळकर्णी (बाबूजी) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे व डॉ. किरण वाघमारे उपस्थित होते. परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना प्रा. संजय खडसे म्हणाले की, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ग्रंथ आणि पुस्तके करीत असतात. या ग्रंथरूपी गुरूमुळेच आज मी तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी एसडीओ म्हणून सर्वांसमक्ष उभा आहे. माझा हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी मी घालवतो. यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे म्हणाल्या की, पुस्तक वाचणे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न असतो. जीवनावर ग्रंथांचा प्रभाव पडतो म्हणजे काय, तर वाचन करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल. पुस्तक हातात घेतले की, आपली मानसिकता बदलते व आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लागतो. आपले विचार व्यक्त करताना डॉ. किरण वाघमारे म्हणाले की, ग्रंथ हे जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करीत असतात. जीवनातील अडचणीच्या काळात ग्रंथप्रेम कसे जपले, याबाबत त्यांनी आपला अनुभव कथन केले. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर सदैव अपडेट राहणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुहास कुळकर्णी म्हणाले की, ग्रंथांमुळे मनाची कवाडे उघडतात. शिल्पकार जशी मूर्ती घडवितो, त्याच पद्धतीने ग्रंथ आपले जीवन घडविण्यास कारणीभूत ठरतात. वेदांचा वेद तेव्हाच कळतो, जेव्हा वेदना कळतात. त्या वेदना उमजण्याचे सार्मथ्य ग्रंथांच्या वाचनामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार श्यामराव वाहूरवाघ यांनी मानले.