शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जीवनाला दिशा देण्याचे काम ग्रंथरूपी गुरू करतात!

By admin | Updated: February 17, 2016 02:20 IST

ग्रंथोत्सवातील परिसंवादात उमटला सूर.

अकोला: मनुष्याच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सर्वाधिक प्रभाव कुणाचा पडत असेल, तर वाचनाचा. एकदा नातेवाईक आपली साथ सोडतील, पण ग्रंथ हे आपल्याला सतत काही ना काही मार्गदर्शन करतात. यशाचं शिखर गाठायचं असेल, तर ज्ञान आवश्यक आहे आणि ते मिळवायचं असेल, तर वाचनाशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून वाचनालय हे मंदिर व ग्रंथ हे दैवत मानले, तर प्रसादरूपी यश आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही, असे विचार ग्रंथोत्सवातील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले. शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी सकाळी ११ वाजता ग्रंथाने मला काय दिले? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुहास कुळकर्णी (बाबूजी) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे व डॉ. किरण वाघमारे उपस्थित होते. परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त करताना प्रा. संजय खडसे म्हणाले की, जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम ग्रंथ आणि पुस्तके करीत असतात. या ग्रंथरूपी गुरूमुळेच आज मी तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी एसडीओ म्हणून सर्वांसमक्ष उभा आहे. माझा हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी मी घालवतो. यामुळे भविष्यात नक्कीच परिवर्तन घडून येईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघाच्या सचिव सीमा शेटे-रोठे म्हणाल्या की, पुस्तक वाचणे म्हणजे स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न असतो. जीवनावर ग्रंथांचा प्रभाव पडतो म्हणजे काय, तर वाचन करण्याआधी आणि केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल. पुस्तक हातात घेतले की, आपली मानसिकता बदलते व आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करायला लागतो. आपले विचार व्यक्त करताना डॉ. किरण वाघमारे म्हणाले की, ग्रंथ हे जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करीत असतात. जीवनातील अडचणीच्या काळात ग्रंथप्रेम कसे जपले, याबाबत त्यांनी आपला अनुभव कथन केले. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, तर सदैव अपडेट राहणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येकाने वाचनाची गोडी जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सुहास कुळकर्णी म्हणाले की, ग्रंथांमुळे मनाची कवाडे उघडतात. शिल्पकार जशी मूर्ती घडवितो, त्याच पद्धतीने ग्रंथ आपले जीवन घडविण्यास कारणीभूत ठरतात. वेदांचा वेद तेव्हाच कळतो, जेव्हा वेदना कळतात. त्या वेदना उमजण्याचे सार्मथ्य ग्रंथांच्या वाचनामुळेच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार श्यामराव वाहूरवाघ यांनी मानले.