शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच वर्षांतही १० हजार सौर पंपांचे उद्दिष्ट अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:16 IST

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनासाठी राष्ट्रीय स्तरावर एक लाख तर राज्य स्तरावर दहा हजार सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट पाच वर्षांतही पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देराज्यात १० हजार सौर कृषी पंप लावण्याला मंजुरी दिली होती.पहिल्या टप्प्यातील ६१४० पैकी १२६८, दुसºया टप्प्यातील संपूर्ण २४६० असे एकूण ३७२८ कृषी पंप आस्थापित करण्यात आले.त्यानंतर आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१७ मध्ये दोन टप्प्यात सात हजार कृषी पंपांना मंजुरी दिली.

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनासाठी राष्ट्रीय स्तरावर एक लाख तर राज्य स्तरावर दहा हजार सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट पाच वर्षांतही पूर्ण झाले नाही. त्यातच आता नव्याने सात हजार पंपांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे.केंद्र शासनाने डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ या काळात शेतकºयांसाठी राज्यात १० हजार सौर कृषी पंप लावण्याला मंजुरी दिली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६१४० पैकी १२६८, दुसºया टप्प्यातील संपूर्ण २४६० असे एकूण ३७२८ कृषी पंप आस्थापित करण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१७ मध्ये दोन टप्प्यात सात हजार कृषी पंपांना मंजुरी दिली. त्यावेळी सुकाणू समितीच्या निर्णयानुसार अंशदान भरलेल्या लाभार्थींनाच कृषी पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकºयांना पंप देण्यासाठीची संख्या ५६५० एवढीच निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यापैकी आधी आस्थापित झालेल्या ३७२८ सौर कृषी पंपांनाच केंद्र शासनाचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. उर्वरित १९२२ पंपांना केंद्र शासन अर्थसाहाय्य देणार नाही. त्यासाठी १०३ कोटी रुपये निधीची गरज लागणार आहे. ती गरज अतिरिक्त वीज विक्री करातून जमा होणाºया निधीतून किंवा इतर स्रोतातून भागविण्याची तयारी शासनाने केली आहे.

आधीचे अपूर्ण, नव्याचे काय होणार?नव्या उद्दिष्टातील सात हजार पंपांपैकी २५ टक्के ३ तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे दिले जातील. त्यातील ७७.५ टक्के सर्वसाधारण, १३.५ टक्के अनुसूचित जाती, ९ टक्के पंप गृहितक वाटप केले जाणार आहेत. आधीचे उद्दिष्टच पूर्ण न झाल्याने नव्याने दिलेले उद्दिष्ट, त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी मिळेल की नाही, यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती