शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अकोला जिल्हय़ात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या चार अपघातात पाच जण ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर/दिग्रस बु.  : पातूर तालुक्यात दोन वेगवेगळ्य़ा अपघातात तीन जण तर उरळ येथे बस खाली आल्याने विद्यार्थी तर मळसूर येथे झालेल्या अपघातात युवक ठार झाला.  शुक्रवारी घडलेल्या या चार अपघातांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. चान्नी फाट्यावर दुचाकी घसरल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शिर्ला फाट्याजवळ प्रवासी वाहनाने दुचाकीस ...

ठळक मुद्देचान्नी फाट्यावर अज्ञात वाहनाची तर शिर्ला फाट्यावर प्रवासी वाहनाची दुचाकीस धडकमळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठारमळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर/दिग्रस बु.  : पातूर तालुक्यात दोन वेगवेगळ्य़ा अपघातात तीन जण तर उरळ येथे बस खाली आल्याने विद्यार्थी तर मळसूर येथे झालेल्या अपघातात युवक ठार झाला.  शुक्रवारी घडलेल्या या चार अपघातांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. चान्नी फाट्यावर दुचाकी घसरल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शिर्ला फाट्याजवळ प्रवासी वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार झाला. पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे सोपीनाथ महाराज यात्रेनिमित्त परिसरात व रस्त्यावर मोठी गर्दी आहे. पातूर येथील देवीदास सुरवाडे (४८) आणि सुनील गवई (४५) हे २ फेब्रुवारीला त्यांच्या सीजी 0७ - ७७२२ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीने वाडेगाव येथून पातूरकडे जात होते. चान्नी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.  यामध्ये देवीदास सुरवाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. सुनील गवई यांना उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश देशमुख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. पातूरवरून अकोलाकडे जात असलेल्या प्रवासी वाहन क्र.एमएच ३७-६९७४ ने शिर्ला फाट्याजवळ समोरून येत असलेल्या दुचाकी क्र.एमएच ३0 एडी ९८३७ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला व दुचाकी चालक म. शयबाज म. ऐजाज सौदागर रा. मुजावरपुरा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पातूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहेत. 

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी पातूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. पातूर शहरातून बाळापूर, अकोला, पांगराबंदी, माळ राजुरा, आलेगाव या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. या अवैध प्रवासी वाहतुकीने युवकाचा बळी घेतला आहे. 

उरळ येथे बसखाली सापडल्याने विद्यार्थी ठारलोकमत न्यूज नेटवर्कउरळ : बसखाली सापडल्याने शालेय विद्यार्थी ठार झाल्याची घटना उरळ येथील बसस्थानकावर २ फे ब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. उरळ येथील शिवशंकर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत असलेला ओम प्रभाकर इंगळे (१२) रा. मोरगाव भाकरे हा शाळा सुटल्यानंतर बस पकडण्यासाठी बसस्थानकावर आला होता. सायंकाळी बाजारातील लोकांची व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ओम इंगळे हा बसच्या मागच्या चाकाखाली सापडला. चालकाने बस सुरू केल्याने ओमच्या अंगावरून मागचे चाक जाऊन तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर उपस्थित ग्रामस्थ व पोलिसांनी गंभीर जखमी बालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला अकोला येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच जमादार रामकृष्ण ढोकणे, किशोर पाटील, दादाराव लिखार, संजय वानखडे, नेरकर, प्रवीण मोरे आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

मळसूर-विवरा मार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठारलोकमत न्यूज नेटवर्कमळसूर : मळसूर-विवरा रस्त्यावर २ फेब्रुवारीच्या रात्री ७.३0 वाजता मोटारसायकल अचानक घसरून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.मळसूर येथील दीपक सखाराम गडदे (३५) हा युवक शुक्रवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास मोटारसायकलने विवराकडून मळसूरकडे येत असताना त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून मोटारसायकल रस्त्यावर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक गडदेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे वृत्त लिहिपर्यंत या घटनास्थळी पोलीस पोहोचले नव्हते. 

टॅग्स :AccidentअपघातAkola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यू