शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

बियाणे बाजारात आतापर्यंत पाच टक्केच खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:31 PM

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देयावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले. याअगोदर बियाणे खरेदीला इतका उशीर कधीच झाला नसल्याचे बियाणे कंपन्या वर्तुळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या हातात पैसा नाही, हे यामागील एक कारण असले, तरी मान्सूनचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय शेतकरी पेरणीसाठीची तिफण बाहेर काढणार नसल्याचे कृषी तज्ज्ञही शक्यता वर्तवित आहेत, असे चित्र संपूर्ण राज्यासह विदर्भातील आहे.यावर्षी मान्सूनचे अनुकूल भाकीत बघता खासगी कंपन्यांसह महाबीजने बाजारात बियाणे आणले; पण मागच्या वर्षीचा अनुभव बघता शेतकरी सध्याच बियाणे खरेदी करायला तयार नाहीत. मागच्या वर्षी शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. मूग, उडिदाचे पीक हातचे गेले. सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले. विषम हवामानामुळे कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.विदर्भातील ४९ लाख हेक्टरपैकी खरिपाचे सर्वात जास्त ३२ लाख हेक्टरच्यावर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांत अकोल्याची बियाणे बाजारपेठ मोठी असून, अनेक प्रकारच्या बियाणे खरेदीसाठी येथे शेतकरी येतात. येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे व महाराष्टÑ राज्य बियाणे महमंडळाचे (महाबीज) मुख्यालय आहे. कृषी विद्यापीठाचे व महाबीजचे बियाणे शेतकरी खरेदी करतात; पण यावर्षी अनुदानावरील बीजोत्पादनासाठीच्या परमिटवरील बियाणे काही प्रमाणात शेतकºयांनी खरेदी केले. बीजोत्पादनासाठीच्या बियाण्यांची मर्यादा एक एकर असून, सोयाबीनची ३० किलोची गोणी १,३५० रुपयांना आहे. काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के किरकोळ बियाणे विक्री झाली.- किरकोळ बियाणे विक्री आतापर्यंत केवळ पाच टक्के झाली, असे चित्र यापूर्वी कधी बघितले नाही. यापूर्वी जून रोजी ८ तारखेपर्यंत बियाणे संपून जात होते. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.दिनेशभाई शाह,कृषी निविष्ठा अभ्यासक,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती