शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भारतात प्रथमच कोहळ्यापासून बनविली चेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:52 IST

ग्रासरूट इनोव्हेटर :  भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.  

- राजरत्न शिरसाट (अकोला)

शेतकऱ्यांना खेड्यातच शेतमालावर प्रक्रिया करता यावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी अवजारांसह कृषी प्रक्रिया यंत्राची निर्मिती केली आहे. बाजारातील गरज लक्षात घेता चेरी, टुटीफ्रुटी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

सध्या कच्च्या पपईपासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात येते. त्यासाठी विविध १२ प्रकारची चेरी, टुटीफ्रुटी बनविण्यात आली. पपईपासून बनलेल्या चेरी, तुटीफ्रुटीचा रंग, सुगंध,चव,पसंती इत्यादीबाबत परीक्षण करण्यात आले, तसेच कोहळ्यापासून बनलेल्या चेरीचेही परीक्षण करण्यात आले. या दोन्हीचा अभ्यास, परीक्षण करू न कोहळ्यापासून तयार करण्यात आलेल्या चेरी,टुटीफ्रुटी बनविण्याच्या सर्वोत्तम पद्धतीला निर्धारित करण्यात आले. अकोल्याच्या या कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतात प्रथमच कोहळ्यापासून चेरी, टुटीफ्रुटी बनविण्याचे यशस्वी तंत्रज्ञान विकसित केले आहे.  

कोहळ्यापासून भुकटी व त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ या तंत्रज्ञानापासून तयार करता येतात. चेरी, टुटीफ्रुटी तयार करण्यासाठी सुरुवातीला कोहळ्याच्या गराचे तुकडे करू न त्यांना ०.७५ टक्के चुन्याच्या पाण्यात १२ तास ठेवले जाते. त्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन हे तुकडे ६० टक्के साखरेमध्ये १२ तास ठेवण्यात येतात. हे मिश्रण नंतर उकळविले जाते. उकळविण्याच्या शेवटी सोडियम बन्झोएट (०.२५ टक्के) चेरी, टुटीफ्रुटी ६० डिग्री ब्रिक्स गोडव्यापर्यंत तसेच सायट्रिक अ‍ॅसिड (०.०५ टक्के) यात टाकण्यात येते. यानंतर आल्यावर सुकविणे थांबवावे लागते. यातील जास्तीचा साखरेचा पाक गाळून चेरीला पंख्याखाली सुकविण्यासाठी ठेवण्यात येते. त्यानंतर बॅगमध्ये पॅकिंग करून त्याची विक्री करता येते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी