शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

दुष्काळाच्या प्रथम झटक्यात अमरावती विभागातील ३२ तालुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:45 PM

अकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: दुष्काळ ठरविण्याच्या निकषानुसार प्रथम कळ लागू होणाऱ्या राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये अमरावती महसूल विभागातील ३२ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोल्यातील अकोट, पातूर तालुके वगळण्यात आले. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता मध्यम किंवा गंभीर असल्यास दुसरी कळ लागू होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.चालू वर्षातील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, जलसाठे, पाणी पातळीची दृश्य स्थिती पाहता राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये प्रथम टप्प्यातील दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये विभागातील ३१ पैकी पाच अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये अकोला, बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये दुष्काळ ठरविण्याचे निकष निश्चित केले आहेत. त्या निकषानुसार तीन टप्प्यातील तपासणी, विविध घटकांच्या अहवालावरून दुष्काळ जाहीर केला जातो. प्रत्येक टप्प्याच्या माहितीनुसारच दुसरा टप्पा निश्चित केला जातो. त्यामुळे दुष्काळाचा पहिला टप्पा म्हणजे ‘प्रथम कळ’ लागू झाली तरी दुष्काळ जाहर होईल, याची कोणतीच शाश्वती नाही. अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील इतर घटकांसंदर्भात अहवाल जिल्हास्तरीय समिती देणार आहे. 

जिल्हास्तरीय समिती ठरविणार दुष्काळाची तीव्रता!जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सचिव म्हणून आहेत. इतर अधिकाºयांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर नागपूर येथील तज्ज्ञ व्यक्ती, निवासी उपजिल्हाधिकारी, निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता ठरविणार आहेत. दुष्काळ मध्यम किंवा गंभीर ठरविला जाणार आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास दुष्काळज्या तालुक्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तेथेच दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पीक परिस्थितीचा अहवाल घेणे आवश्यक आहे.

निर्देशांकानुसार ठरेल दुष्काळ!वनस्पतीशी संबंधित निर्देशांकामध्ये पीक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. सोबतच पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक आर्द्रता निर्देशांक, भूजल पातळी निर्देशांक या सर्व घटकांची तालुकानिहाय आकडेवारी गृहीत धरून दुष्काळ किती प्रभावी आहे, याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून घेतला जाणार आहे. सद्यस्थितीत पर्जन्यमानात तूट असणे या निकषावर दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू झाली आहे; मात्र तीव्र किंवा गंभीर दुष्काळ जाहीर होईलच, याची कोणतीही शाश्वती नसल्याचे या निकषावरून स्पष्ट होत आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीdroughtदुष्काळ