शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कृषी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक, सामाजिक विकास - कुलगुरू

By admin | Updated: May 26, 2017 02:58 IST

कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय पूर्वहंगामी कृषी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशांतर्गत कृषी कृषी संशोधकांच्या अथक परिश्रमातून शेतीची उत्पादकता निश्चितच वाढली आहे. यामागे शेतकऱ्यांचे श्रमही तेवढेच मोलाचे आहेत. शेतकऱ्यांनी आता गावपातळीवरच शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारल्यास त्यातून रोजगावर निर्मिती होऊन आर्थिक, सामाजिक विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने येथील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून कुलगुरू बोलत होते. मेळाव्याला विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, प्रगतशील शेतकरी बाबाराव जाणकार व अमोल मडोकार यांची उपस्थिती होती.कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले, देशांतर्गत कृषी विद्यापीठांच्या भरीव योगदानाने शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल दृष्टिपथात येत कधीकाळी शेतमाल आयात करणारे राष्ट्र आज निर्यातदारांच्या यादीत अग्रक्रमाकडे वाटचाल करीत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तथा उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचे औचित्य साधत विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहयोगाने आयोजित अतिशय महत्त्वाकांक्षी पूर्वहंगामी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियानाच्या जनजागृती पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी या अभियानात कृषी विद्यापीठ संपूर्ण शक्तीने उतरले आहे. डॉ. इंगोले यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक रचना कशी ठेवावी, तसेच मृद व जलसंधारणाच्या कामावर भर देण्याचा सल्ला दिल्ला. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी प्रगतशील कास्तकार बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांची उपस्थिती होती. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तांत्रिक सत्रात आधुनिक शेती व्यवस्थापनाचे तंत्र उपस्थितांना अवगत करीत त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकासमाधान केले. यामध्ये प्रामुख्याने जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अरविंद तुपे, कापूस विभागाचे डॉ. ताराचंद राठोड, तेलबिया विभागाचे डॉ. एकनाथ वैद्य, कडधान्य विभागाचे डॉ. ए. एन. पाटील, ज्वारी संशोधन विभागाचे डॉ. आर. बी. घोराडे, सोयाबीन विभागाचे डॉ. अनिल ठाकरे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. श्याम घावडे, कृषी शक्ती अवजारे विभागाचे डॉ. शैलेश ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवचरण ठाकरे, वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे डॉ. श्यामसुंदर माने, तणनियंत्रण विभागाचे डॉ. जे. पी. देशमुख, मृदा शास्त्रज्ञ डॉ. विलास खर्चे, कृषी प्रक्रिया विभागाचे प्रा. राजेश मुरूमकार यांचा समावेश होता. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात जवळपास अडीच लाख रुपयांची उलाढाल या मेळाव्यात झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी केले.