शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कृषी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक, सामाजिक विकास - कुलगुरू

By admin | Updated: May 26, 2017 02:58 IST

कृषी विद्यापीठात विदर्भस्तरीय पूर्वहंगामी कृषी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशांतर्गत कृषी कृषी संशोधकांच्या अथक परिश्रमातून शेतीची उत्पादकता निश्चितच वाढली आहे. यामागे शेतकऱ्यांचे श्रमही तेवढेच मोलाचे आहेत. शेतकऱ्यांनी आता गावपातळीवरच शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारल्यास त्यातून रोजगावर निर्मिती होऊन आर्थिक, सामाजिक विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने येथील डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून कुलगुरू बोलत होते. मेळाव्याला विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले, प्रगतशील शेतकरी बाबाराव जाणकार व अमोल मडोकार यांची उपस्थिती होती.कुलगुरू पुढे बोलताना म्हणाले, देशांतर्गत कृषी विद्यापीठांच्या भरीव योगदानाने शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल दृष्टिपथात येत कधीकाळी शेतमाल आयात करणारे राष्ट्र आज निर्यातदारांच्या यादीत अग्रक्रमाकडे वाटचाल करीत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तथा उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचे औचित्य साधत विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सहयोगाने आयोजित अतिशय महत्त्वाकांक्षी पूर्वहंगामी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियानाच्या जनजागृती पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी या अभियानात कृषी विद्यापीठ संपूर्ण शक्तीने उतरले आहे. डॉ. इंगोले यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक रचना कशी ठेवावी, तसेच मृद व जलसंधारणाच्या कामावर भर देण्याचा सल्ला दिल्ला. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी प्रगतशील कास्तकार बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांची उपस्थिती होती. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तांत्रिक सत्रात आधुनिक शेती व्यवस्थापनाचे तंत्र उपस्थितांना अवगत करीत त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकासमाधान केले. यामध्ये प्रामुख्याने जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अरविंद तुपे, कापूस विभागाचे डॉ. ताराचंद राठोड, तेलबिया विभागाचे डॉ. एकनाथ वैद्य, कडधान्य विभागाचे डॉ. ए. एन. पाटील, ज्वारी संशोधन विभागाचे डॉ. आर. बी. घोराडे, सोयाबीन विभागाचे डॉ. अनिल ठाकरे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. श्याम घावडे, कृषी शक्ती अवजारे विभागाचे डॉ. शैलेश ठाकरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. शिवचरण ठाकरे, वनस्पती विकृतीशास्त्र विभागाचे डॉ. श्यामसुंदर माने, तणनियंत्रण विभागाचे डॉ. जे. पी. देशमुख, मृदा शास्त्रज्ञ डॉ. विलास खर्चे, कृषी प्रक्रिया विभागाचे प्रा. राजेश मुरूमकार यांचा समावेश होता. याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी बाबाराव जाणकार आणि युवा शेतकरी अमोल माडोकार यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात जवळपास अडीच लाख रुपयांची उलाढाल या मेळाव्यात झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी केले.