शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:45 AM

यशकथा : शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला.

- सत्यशील सावरकर (तेल्हारा,अकोला)

अकोला   जिल्ह्यातील  वरूड बिहाडे (ता. तेल्हारा) येथील प्रमोद श्रीकृष्ण बिहाडे हे पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व किराणा व्यवसायात वडील थकल्यामुळे स्वत: गुंतले. सुरुवातीला रासायनिक खते व विषारी औषधे लोक वापरतात म्हणून वापरले. पीकसुद्धा झाले. मात्र, शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी विविध शिबिरे घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

सुरुवातीला २०१६ मध्ये एकरभर जमीन नैसर्गिक पद्धतीत केली, तर या वर्षात पूर्ण अकरा एकर शेतजमिनीत नैसर्गिक पद्धतीने मिश्रपिकाची पेरणी केली आहे. यामध्ये पाच एकर सोयाबीन, एक एकर ऊस, सोयाबीन, दोन एकर हळद, तूर, तीन एकर कपाशी, चवळी-उडीद पेरणी ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली. यासाठी पेरणीपूर्व मशागत करताना नागरटी, वखरणीसोबत देशी गायीच्या शेणापासून बनविलेले घनजीवामृत सोडले. त्यानंतर बियाणे व पेरणी नियोजन करून जसजशी पीकवाढ होत होती त्या प्रमाणात डवरणी, निंदण, वखरणी करून नैसर्गिकरीत्या बनविलेले जीवामृत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क, सप्तधान्य अंकुर अर्क, आंबट ताक इत्यादींची वेळोवेळी नियमित फवारणी केल्याने पिकांवर कोणताही रोग किंवा कीटकांचे प्रमाण नाही. त्याचप्रमाणे पेरणीनंतर एक महिन्याने एकरी दोनशे लिटरप्रमाणे जीवामृताचा पिकाला स्प्रिंकलरद्वारे डोस दिला.

यामुळे आज पीक जोमात आहे. गत तीन-चार वर्षांत नवनवीन प्रयोग परंपरागत पिकात केले. मिश्र पीक पद्धती अवलंबून शेती केल्याने चांगले उत्पादन झाले. एका पिकात कमी उत्पादन झाल्यास दुसऱ्या पिकाने चांगले उत्पादन देऊन आर्थिक बजेट समतोल ठेवला. २०१५-१६ मध्ये तुरीची पेरणी केली. यामध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद घेतला. एकरी तेरा क्विंटल तूर व चार क्विंटल उडीद झाले.

त्यानंतर पुढील वर्षी मिश्रपीक पद्धतीने सहजीवन पिके घेतली. तूर, ज्वारी, उडीद, हळद, मिरची यांची चोवीसच्या सोयात पेरणी केली. यामध्ये दर नऊ फुटांवर तुरीचे तास, दोन तासांत ज्वारी व त्यामध्ये उडीद, तसेच तूर व ज्वारीच्या फटात आजूबाजूला एक फुटावर हळद पीक घेतले. यामधे तूर एकरी सहा क्विंटल, ज्वारी चार क्विंटल, उडीद पाच क्विंटल, हळद बारा क्विंटल आठ गुंठ्यामध्ये पीक आले. यामध्ये मिरची पिकाने उत्पादन कमी दिले तरी खर्च वजा एकरी एक लाख रुपयांचे पीक मिळाले. यामधील उडीद व ज्वारी थेट न विकता याचे मिश्र दळण करून आटा विक्री ठिकठिकाणी आयोजित प्रदर्शनात केली. यामध्ये चांगला भाव मिळाला व विनाविषारी औषध खताचा माल विकण्याने मानसिक समाधान मिळून आर्थिक बजेट बसले.  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी