शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 11:45 IST

यशकथा : शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला.

- सत्यशील सावरकर (तेल्हारा,अकोला)

अकोला   जिल्ह्यातील  वरूड बिहाडे (ता. तेल्हारा) येथील प्रमोद श्रीकृष्ण बिहाडे हे पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व किराणा व्यवसायात वडील थकल्यामुळे स्वत: गुंतले. सुरुवातीला रासायनिक खते व विषारी औषधे लोक वापरतात म्हणून वापरले. पीकसुद्धा झाले. मात्र, शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी विविध शिबिरे घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

सुरुवातीला २०१६ मध्ये एकरभर जमीन नैसर्गिक पद्धतीत केली, तर या वर्षात पूर्ण अकरा एकर शेतजमिनीत नैसर्गिक पद्धतीने मिश्रपिकाची पेरणी केली आहे. यामध्ये पाच एकर सोयाबीन, एक एकर ऊस, सोयाबीन, दोन एकर हळद, तूर, तीन एकर कपाशी, चवळी-उडीद पेरणी ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली. यासाठी पेरणीपूर्व मशागत करताना नागरटी, वखरणीसोबत देशी गायीच्या शेणापासून बनविलेले घनजीवामृत सोडले. त्यानंतर बियाणे व पेरणी नियोजन करून जसजशी पीकवाढ होत होती त्या प्रमाणात डवरणी, निंदण, वखरणी करून नैसर्गिकरीत्या बनविलेले जीवामृत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क, सप्तधान्य अंकुर अर्क, आंबट ताक इत्यादींची वेळोवेळी नियमित फवारणी केल्याने पिकांवर कोणताही रोग किंवा कीटकांचे प्रमाण नाही. त्याचप्रमाणे पेरणीनंतर एक महिन्याने एकरी दोनशे लिटरप्रमाणे जीवामृताचा पिकाला स्प्रिंकलरद्वारे डोस दिला.

यामुळे आज पीक जोमात आहे. गत तीन-चार वर्षांत नवनवीन प्रयोग परंपरागत पिकात केले. मिश्र पीक पद्धती अवलंबून शेती केल्याने चांगले उत्पादन झाले. एका पिकात कमी उत्पादन झाल्यास दुसऱ्या पिकाने चांगले उत्पादन देऊन आर्थिक बजेट समतोल ठेवला. २०१५-१६ मध्ये तुरीची पेरणी केली. यामध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद घेतला. एकरी तेरा क्विंटल तूर व चार क्विंटल उडीद झाले.

त्यानंतर पुढील वर्षी मिश्रपीक पद्धतीने सहजीवन पिके घेतली. तूर, ज्वारी, उडीद, हळद, मिरची यांची चोवीसच्या सोयात पेरणी केली. यामध्ये दर नऊ फुटांवर तुरीचे तास, दोन तासांत ज्वारी व त्यामध्ये उडीद, तसेच तूर व ज्वारीच्या फटात आजूबाजूला एक फुटावर हळद पीक घेतले. यामधे तूर एकरी सहा क्विंटल, ज्वारी चार क्विंटल, उडीद पाच क्विंटल, हळद बारा क्विंटल आठ गुंठ्यामध्ये पीक आले. यामध्ये मिरची पिकाने उत्पादन कमी दिले तरी खर्च वजा एकरी एक लाख रुपयांचे पीक मिळाले. यामधील उडीद व ज्वारी थेट न विकता याचे मिश्र दळण करून आटा विक्री ठिकठिकाणी आयोजित प्रदर्शनात केली. यामध्ये चांगला भाव मिळाला व विनाविषारी औषध खताचा माल विकण्याने मानसिक समाधान मिळून आर्थिक बजेट बसले.  

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी