शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शेतकरी रांगेत अन् बॅगा संपल्या; महाबीजच्या बियाण्यांसाठी उडाला गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 10:51 AM

Akola News : दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकृषी सेवा केंद्रांवर रांगाच रांगा शेतकरी संतप्त; पोलिसांना करावे लागले पाचारण

अकोला : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रांवर महाबीजच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शनिवारी टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला. यावेळी शेतकऱ्यांचे उग्र रूप पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी सोमवारी बियाणे देण्यात येईल, असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविण्यात आले. यावर्षी सोयाबीनची पेरणी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे; मात्र यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा भाव जास्त असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या बियाणांसाठी मोठ्या रांगा लागत आहे. शहरातील कृषी सेवा केंद्रांवर शनिवारीसुद्धा ही स्थिती कायम होती. टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे सकाळपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या; परंतु दुपारी अचानक बियाणे संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा पारा चढला व मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करीत सोमवारी बियाणे आल्यावर घेऊन जावे, असे सांगितले आहे.

 

दोन-तीन तासांपासून उन्हात ताटकळत

महाबीजचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी दोन-तीन तासांपासून उन्हामध्ये ताटकळत उभे होते. या ठिकाणी सावलीसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे.

 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बियाणांसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून उभे राहावे, अशा कुठल्याही सूचना व व्यवस्था करण्यात आली नव्हती. दहा फुटांमध्ये २५-३० शेतकरी उभे होते. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. हीच स्थिती इतर कृषी सेवा केंद्रांवरदेखील होती.

 

१४० क्विंटल बियाणे वाटप

शनिवारी सकाळपासून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे वाटप सुरू होते. टिळक रोडवरील एका कृषी सेवा केंद्रांवर बियाणांची कमतरता असल्याने केवळ १४० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले.

 

१०० कुपन वाटप

बियाणे वितरकाकडे गोंधळ उडाल्याने यावेळी शेतकऱ्यांना कुपन वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांना सोमवारी येण्याचे सांगण्यात आले आहे. जवळपास १०० कुपन वाटप झाले आहे. शेतकऱ्यांनीही प्रत्येकी तीन बॅगा देण्यात याव्या, अशी मागणी केली.

 

बियाणे विक्रेते म्हणतात...

उपलब्ध बियाणांचे वाटप करण्यात आले. उद्या काही बियाणे माल येणार आहे. शेतकऱ्यांना सोमवारी यावे असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे कुपन आहे अशांना सोमवारी बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

- सुभाष सावजी, बियाणे विक्रेता

 

शेतकरी म्हणतात...

सकाळपासून महाबीजच्या बियाणांसाठी रांगेत उभे आहोत; परंतु येथे बियाणे वाटपाबाबत कुठलेही नियोजन नाही. ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगितले. आता सोमवारी पुन्हा यावे लागणार आहे. ग्रामीण भागात राहत असल्याने येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे.

- नारायण सावळे, शेतकरी, देऊळगाव

 

कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातून शहरात येणे धोकादायक आहे. तरी कडक उन्हामध्ये बियाणांसाठी उभे होतो. आधीच बियाणे नसल्याचे सांगितले असते तर विनाकारण रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती. परत परत चकरा माराव्या लागत आहे.

- रामा अघडते, शेतकरी, दहिगाव गावंडे

 

महाबीजचे बियाणे मिळाले नाही. आता कुपन दिले आणि सोमवारी या असे सांगितले आहे. लवकर येऊन रांग लावावी लागत आहे. सावलीची कुठलीही व्यवस्था नाही. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

- बालकिशन बरदीया, शेतकरी, सांगळूद

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMahabeejमहाबीज