शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे अपयश; शेतकरी आत्महत्या वाढत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:06 PM

अकोला : कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून ...

अकोला: कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण होईल, ही अपेक्षा प्रशासकीय यंत्रणांच्या दप्तरदिरंगाईमुळे फोल ठरली आहे. तब्बल दीड वर्षापासून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कासवगतीनेच सुरू असल्यामुळे शेतकºयांमधील नैराश्य वाढतेच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अकोला जिल्ह्याची आकडेवारी तपासली असता जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल ११८ शेतकऱ्यांनी गळफास आवळला आहे. नापिकी, कर्जबाजरीपणा व शेतमालाचा कमी भाव प्रामुख्याने या तीन कारणांमुळेच आत्महत्या झाल्याचे सरकारी दप्तरात नोंदविलेले आहे. नापिकीला लहरी निसर्ग, शेतमालाच्या कमी भावाला सरकारी धोरण कारणीभूत आहे, तसेच कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी दिलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची संथ गती आत्महत्यांसाठी जबाबदार ठरली आहे.अपुऱ्या व लहरी पावसामुळे दुष्काळ आणि नापिकीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. भाजपा सरकारने कर्जबाजारी झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली; मात्र या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्यामुळे सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्याच आहेत. विशेष म्हणजे, गत वर्षभरात झालेल्या ११८ आत्महत्यांमध्ये ६६ शेतकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या असून, ३१ आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत. तब्बल २१ आत्महत्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या आत्महत्यांची वाढती संख्या व कर्जमाफ ीच्या अंमलबजावणीची स्थिती यांचे प्रमाण पाहिले असता अंमलबजावणीमधील अपयश अधोरेखित होते. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत १ लाख २९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असला तरी, नऊ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची योजना आणली. सारे सोपस्कार पार पाडून योजना तयार झाली, घोषित झाली; मात्र अंमलबजावणी करणाºया यंत्रणेमुळे ही योजना सपशेल अपयशी ठरल्याने शेतकºयांमधील नैराश्य कायम असून, त्याचाच परिणाम आत्महत्यामध्ये वाढ होण्यात झाली आहे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या