शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

विदर्भात विदेशी मत्स्य प्रजातींचा प्रसार

By admin | Updated: February 13, 2016 01:54 IST

पर्यावरण बदल पथ्यावर: स्थानिक मासेमारांवर उपासमारीची वेळ.

दादाराव गायकवाड/ कारंजा लाड: एकिकडे सततच्या अवर्षणामुळे मासेमारी हा व्यवसाय मोठय़ा संकटात असतानाच, विदर्भात काही विदेशी प्रजातींचा प्रसार वाढला आहे. त्यामुळेच विदर्भासह देशभरातील स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत असून, त्याचा स्थानिक पर्यावरणावरही वाईट परिणाम होत असल्याचे मत पर्यावरण आणि मत्स्य अभ्यासकांनी मांडले आहे. भारतातील मत्स्य सृष्टीला विदेशी मत्स्य प्रजातींमुळे प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. विदर्भापुरता विचार केला तर आज विदर्भात पाच प्रकारच्या विदेशी मत्स्य प्रजाती पर्यावरणात सोडण्यात आल्या आहेत. त्यात चंदेरा, तिलापिया, सायप्रिनस, आफ्रिकन मागुर, गप्पी यांचा समावेश होतो. विदर्भात आणि इतर ठिकाणीसुद्धा सायप्रिनस नावाचा मासा मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जातो. याच सायप्रिनस मत्स्य प्रजातीने काश्मीर खोर्‍यातील सिजोथोरॅसिनी नावाच्या स्थानिक मत्स्य प्रजातीच्या एका मोठय़ा गटालाच संपवून टाकलं आहे. दुसरी प्रजाती म्हणजे सिल्वर कार्प (चंदेरा) ही प्रजातीसुद्धा आपल्याकडे मत्स्य पालनासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाते. या मत्स्य प्रजातीनेसुद्धा गोविंदसागर आणि अन्य अनेक जलाशयातील कटला या स्थानिक मत्स्य प्रजातीला संपवून टाकले आहे. पर्यावरण तज्ज्ञ तथा मत्स्य अभ्यासक डॉ. नीलेश हेडा यांना २00३ च्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील कठाणी नदीत पूर्व आफ्रिकेतल्या नद्यांमध्ये आढळणारा तिलापिया नावाचा मासा आढळून आला. स्थानिक मत्स्य प्रजातींचा कर्दनकाळ हा मासा असल्याचे त्यांना कळले. १९५२ मध्ये हा मासा भारतात सोडण्यात आला होता. आता याची प्रजाती सगळीकडेच पसरली आहे. हा मासा आपल्या पिलांची काळजी घेतो. आपल्या पिलांना तोंडात ठेवतो. तो इतर माश्यांची अंडी खातो. कोणत्याही परिस्थितीत जगतो. त्यावर रोग येत नाही. त्यामुळे घोगर, जरांग, कडू, पिंजर आणि तंबू या स्थानिक मत्स्य प्रजाती नष्ट होत आहेत.