शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी समिती ठरवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:34 IST

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. 

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचारी करणार प्राथमिक पडताळणीकुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी दिली जात आहे. त्यामध्ये नियमित परतफेड  करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान, कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकर्‍यांना विशेष  योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी थकबाकीदार शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज विविध संकेतस् थळावर सादर केले. २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार  ४३ शेतकर्‍यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी  १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज भरले. अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे  चावडी वाचन २७ व २८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी  तालुकास्तरीय समितीचे अधिकारी-कर्मचारी गावात धाव  घेणार आहेत. त्यावेळी ज्या शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले,  ते लाभासाठी पात्र आहेत की नाही, याची पडताळणी अ ितरिक्त माहिती घेऊन केली जाणार आहे. ती माहिती  आल्यानंतर तालुकास्तरीय समितीचे सचिव तालुका उ पनिबंधक पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करून अपलोड कर तील.

 अर्ज होतील तात्पुरते मंजूर, नामंजूरतालुकास्तरीय समिती प्राप्त अर्जांंपैकी पात्र-अपात्र अर्जापुढे  तात्पुरते मंजूर, तात्पुरते नामंजूर आणि नामंजूर असे शेरे  मारणार आहे. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीसोबत  बँकेचा तपशिलाचा ताळमेळ घेतल्यानंतर लाभार्थी पात्रतेचा  निर्णय होईल. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचा निर्णय  महत्त्वाचा ठरणार आहे.

उपविभागीय समितीपुढे आव्हानएखाद्या शेतकर्‍याला तालुकास्तरीय समितीने अपात्र  ठरवल्यास त्यावर त्याला उपविभाग समितीपुढे दाद मागता  येणार आहे. आधी तालुकास्तरीय समितीकडून पूर्ण माहिती  मिळाल्यानंतर समाधान न झाल्यास उपविभाग समितीकडे प्र त्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन गार्‍हाणे मांडता येणार आहे. 

कुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्रएकाच कुटुंबातील (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील  अपत्ये या व्याख्येप्रमाणे) व्यक्तींनी एकच अर्ज करणे  आवश्यक आहे. पडताळणीमध्ये अशा कुटुंबाने एकापेक्षा  अधिक अर्ज केले असतील, तर त्यांना योजनेचा लाभ  मिळणार नाही, ही बाब चावडी वाचनातच सांगितली जाणार  आहे. तसेच त्या कुटुंबाला तेथेच अपात्र ठरवले जाणार  आहे.

नोकरदार घाबरले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सेवेत  असलेल्या शेकडो नोकरदारांनीही अर्ज भरल्याची माहिती  आहे. आता गावपातळीवर पडताळणी होत असल्याने इतर  माहिती ग्रामस्थांकडून मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार  असलेल्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पडताळणीमध्ये  माहिती उघड झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, अशी भिती  त्यांना आहे. त्यासाठी अनेक केंद्र संचालकांना त्यांनी आ पला अर्ज डिलिट करण्याची विनंतीही केली. मात्र, तसे होत  नसल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. हा प्रकार  मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर घडल्याची माहिती  आहे. त्या नोकरदारांमध्ये पोलिसांचा समावेश मोठय़ा  प्रमाणात आहे. -