शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी समिती ठरवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:34 IST

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. 

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचारी करणार प्राथमिक पडताळणीकुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी दिली जात आहे. त्यामध्ये नियमित परतफेड  करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान, कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकर्‍यांना विशेष  योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी थकबाकीदार शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज विविध संकेतस् थळावर सादर केले. २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार  ४३ शेतकर्‍यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी  १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज भरले. अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे  चावडी वाचन २७ व २८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी  तालुकास्तरीय समितीचे अधिकारी-कर्मचारी गावात धाव  घेणार आहेत. त्यावेळी ज्या शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले,  ते लाभासाठी पात्र आहेत की नाही, याची पडताळणी अ ितरिक्त माहिती घेऊन केली जाणार आहे. ती माहिती  आल्यानंतर तालुकास्तरीय समितीचे सचिव तालुका उ पनिबंधक पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करून अपलोड कर तील.

 अर्ज होतील तात्पुरते मंजूर, नामंजूरतालुकास्तरीय समिती प्राप्त अर्जांंपैकी पात्र-अपात्र अर्जापुढे  तात्पुरते मंजूर, तात्पुरते नामंजूर आणि नामंजूर असे शेरे  मारणार आहे. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीसोबत  बँकेचा तपशिलाचा ताळमेळ घेतल्यानंतर लाभार्थी पात्रतेचा  निर्णय होईल. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचा निर्णय  महत्त्वाचा ठरणार आहे.

उपविभागीय समितीपुढे आव्हानएखाद्या शेतकर्‍याला तालुकास्तरीय समितीने अपात्र  ठरवल्यास त्यावर त्याला उपविभाग समितीपुढे दाद मागता  येणार आहे. आधी तालुकास्तरीय समितीकडून पूर्ण माहिती  मिळाल्यानंतर समाधान न झाल्यास उपविभाग समितीकडे प्र त्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन गार्‍हाणे मांडता येणार आहे. 

कुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्रएकाच कुटुंबातील (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील  अपत्ये या व्याख्येप्रमाणे) व्यक्तींनी एकच अर्ज करणे  आवश्यक आहे. पडताळणीमध्ये अशा कुटुंबाने एकापेक्षा  अधिक अर्ज केले असतील, तर त्यांना योजनेचा लाभ  मिळणार नाही, ही बाब चावडी वाचनातच सांगितली जाणार  आहे. तसेच त्या कुटुंबाला तेथेच अपात्र ठरवले जाणार  आहे.

नोकरदार घाबरले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सेवेत  असलेल्या शेकडो नोकरदारांनीही अर्ज भरल्याची माहिती  आहे. आता गावपातळीवर पडताळणी होत असल्याने इतर  माहिती ग्रामस्थांकडून मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार  असलेल्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पडताळणीमध्ये  माहिती उघड झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, अशी भिती  त्यांना आहे. त्यासाठी अनेक केंद्र संचालकांना त्यांनी आ पला अर्ज डिलिट करण्याची विनंतीही केली. मात्र, तसे होत  नसल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. हा प्रकार  मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर घडल्याची माहिती  आहे. त्या नोकरदारांमध्ये पोलिसांचा समावेश मोठय़ा  प्रमाणात आहे. -