शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थी समिती ठरवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:34 IST

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. 

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचारी करणार प्राथमिक पडताळणीकुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान  योजनेसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर  पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी  तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे तालुका उ पनिबंधक काम पाहणार आहेत. चावडी वाचनातून पुढे  आलेल्या माहितीनुसार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेतला  जाणार आहे, हे विशेष. योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत  कर्जमाफी दिली जात आहे. त्यामध्ये नियमित परतफेड  करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर  अनुदान, कर्ज पुनर्गठन केलेल्या शेतकर्‍यांना विशेष  योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी थकबाकीदार शे तकर्‍यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज विविध संकेतस् थळावर सादर केले. २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार  ४३ शेतकर्‍यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी  १ लाख ३८ हजार ५४३ शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज भरले. अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या गावनिहाय याद्यांचे  चावडी वाचन २७ व २८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी  तालुकास्तरीय समितीचे अधिकारी-कर्मचारी गावात धाव  घेणार आहेत. त्यावेळी ज्या शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले,  ते लाभासाठी पात्र आहेत की नाही, याची पडताळणी अ ितरिक्त माहिती घेऊन केली जाणार आहे. ती माहिती  आल्यानंतर तालुकास्तरीय समितीचे सचिव तालुका उ पनिबंधक पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करून अपलोड कर तील.

 अर्ज होतील तात्पुरते मंजूर, नामंजूरतालुकास्तरीय समिती प्राप्त अर्जांंपैकी पात्र-अपात्र अर्जापुढे  तात्पुरते मंजूर, तात्पुरते नामंजूर आणि नामंजूर असे शेरे  मारणार आहे. चावडी वाचनातून पुढे आलेल्या माहितीसोबत  बँकेचा तपशिलाचा ताळमेळ घेतल्यानंतर लाभार्थी पात्रतेचा  निर्णय होईल. त्यासाठी तालुकास्तरीय समितीचा निर्णय  महत्त्वाचा ठरणार आहे.

उपविभागीय समितीपुढे आव्हानएखाद्या शेतकर्‍याला तालुकास्तरीय समितीने अपात्र  ठरवल्यास त्यावर त्याला उपविभाग समितीपुढे दाद मागता  येणार आहे. आधी तालुकास्तरीय समितीकडून पूर्ण माहिती  मिळाल्यानंतर समाधान न झाल्यास उपविभाग समितीकडे प्र त्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन गार्‍हाणे मांडता येणार आहे. 

कुटुंबातून एकच अर्ज ठरणार पात्रएकाच कुटुंबातील (पती-पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील  अपत्ये या व्याख्येप्रमाणे) व्यक्तींनी एकच अर्ज करणे  आवश्यक आहे. पडताळणीमध्ये अशा कुटुंबाने एकापेक्षा  अधिक अर्ज केले असतील, तर त्यांना योजनेचा लाभ  मिळणार नाही, ही बाब चावडी वाचनातच सांगितली जाणार  आहे. तसेच त्या कुटुंबाला तेथेच अपात्र ठरवले जाणार  आहे.

नोकरदार घाबरले.कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सेवेत  असलेल्या शेकडो नोकरदारांनीही अर्ज भरल्याची माहिती  आहे. आता गावपातळीवर पडताळणी होत असल्याने इतर  माहिती ग्रामस्थांकडून मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार  असलेल्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. पडताळणीमध्ये  माहिती उघड झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, अशी भिती  त्यांना आहे. त्यासाठी अनेक केंद्र संचालकांना त्यांनी आ पला अर्ज डिलिट करण्याची विनंतीही केली. मात्र, तसे होत  नसल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. हा प्रकार  मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक केंद्रावर घडल्याची माहिती  आहे. त्या नोकरदारांमध्ये पोलिसांचा समावेश मोठय़ा  प्रमाणात आहे. -