शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ: भाजपला इशारा; ‘वंचित’ला धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:35 IST

मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने एक जागा कायम ठेवत मित्रपक्ष शिवसेनेलाही विजयी केल्यामुळे महायुतीमध्ये आनंदाचे वातावरण असणे साहजिकच आहे; मात्र या निकालासाठी मताधिक्यासाठी द्यावी लागलेली झुंज ही भाजपाला इशारा देणारी ठरली आहे.अकोल्याच्या राजकारणाचा विचार केला तर गत तीन दशकांपासून भाजपाचा प्रभाव राजकारणावर आहे. नेते, महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते या सर्वांच्या अपेक्षांना तोंड देतानाच सर्वांना सत्तेत सामावून घेताना मोठी कसरत नेतृत्वाला करावी लागते. त्यामुळेच काही सत्ताकेंद्रांसाठी ठरलेलीच नावे कायम राहतात. एखाद दुसरा बदल केलाच तर त्याला दीर्घकाळ संधी मिळेल, अशी स्थिती नाही. परिणामी, भाजपामध्येच ‘पठारावस्था’ आली आहे. त्यामुळेच आलेला गाफीलपणा अन् अतिआत्मविश्वास या पक्षाला झुंज देण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होते. पराभवाची कारणे जशी अनेक असतात, तशी विजयाचीही कारणे आहेतच; मात्र जेव्हा विजयासाठी झुंज द्यावी लागते, त्यावेळी मात्र कारणांचा अर्थ समजून घेणे गरजेचे असते. गत पाच वर्षांच्या काळात अकोल्यात विकास कामे झाली, अजूनही सुरूच आहेत; मात्र त्यांच्या दर्जाबद्दल होणारी ओरड, त्याची घेतली जाणारी दखल अन् प्रत्यक्षातील कारवाई यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतर जनतेने दुर्लक्षित केले नाही. त्यामुळेच अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर मतदारसंघांत विजयासाठी भाजपाला शेवटच्या फेरीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. याच मतदारसंघात भाजपाला सहज विजय मिळत आला आहे, हे विशेष. दुसरे म्हणजे पक्षातील छुपी गटबाजी, चुकीच्या गोष्टींची नेत्याकडून होणारी पाठराखण अशा अनेक मुद्यांच्या ऊहापोह करता येईल. मतदारांनी दिलेला इशारा व त्यामागील अर्थ लक्षात घेऊन पुढील कार्यकाळात सुधारणा झाली तर आजचे ‘अच्छे दिन’ कायमच ‘अच्छे दिन’ राहतील, अन्यथा ये पब्लिक है...!४अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना अकोल्याने नेहमीच ताकद दिली आहे. जिल्हा परिषदेची सत्ता, प्रत्येक वेळी विधानसभेत प्रतिनिधित्व गत नऊ लोकसभा निवडणुकांपैकी १९९८ व १९९९ या दोन निवडणुकांमध्ये अ‍ॅड. आंबेडकरांना खासदार करणाऱ्या जिल्ह्यातच यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांची पाटी कोरी राहिली आहे. खरे तर ‘वंचित’साठी हा धक्का आहे.

वंचित’च्या निमित्ताने उभ्या महाराष्टÑात मतांच्या धु्रवीकरणासोबत सत्तेत सहभाग होईल, असे आश्वस्त करणारे वातावरण तयार झाले होते. त्याला मोठा सेटबॅक बसला आहे. त्यामुळे आता कोºया झालेल्या पाटीवर ‘वंचित’च्या माध्यमातून ते कोणते मुळाक्षरे गिरवितात, यावरच पक्षाची व वैचारिक चळवळीची दिशा ठरणार आहे.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आता तरी धडा घेईल का?

भाजपा लाटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी अपवाद वगळता त्यांच्या उमेदवारांनी दिलेली लढत कार्यकर्त्यांना उभारी देणारी आहे. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला, तरच पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊ शकते. राष्टÑवादी काँग्रेसने बाळापूर व मूर्तिजापूर या दोन ठिकाणी निवडणूक लढविली. त्यापैकी बाळापुरात दारुण पराभव झाला, तर मूर्तिजापुरात तिसºया क्रमांकावर राहावे लागले. हे पाहता आता भविष्यात नव्याने पक्ष बांधणीची जबाबदारी पेलावी लागणार असून, नव्या नेतृत्वाला आतापासूनच ताकद देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019