शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नियमबाह्य पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:25 IST

अकोला: बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एक किमी अंतराची अट न पाळता जेथे इयत्ता पाचवा वर्ग सुरू आहे आणि ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे आठवा वर्ग सुरू आहे, अशा ठिकाणचे वर्ग बंद करण्यात यावे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल १९ मेपर्यंत पाठविण्यात यावा, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाचे उप-संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी सोमवारी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देशिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी नियमबाह्य पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली होती.शेखर भोयर यांच्या दोन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. इयत्ता पाचवी व आठवीचे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे आणि पुन्हा असे वर्ग जोडण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अकोला: बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार एक किमी अंतराची अट न पाळता जेथे इयत्ता पाचवा वर्ग सुरू आहे आणि ३ किमी अंतराची अट न पाळता जेथे आठवा वर्ग सुरू आहे, अशा ठिकाणचे वर्ग बंद करण्यात यावे आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल १९ मेपर्यंत पाठविण्यात यावा, असे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाचे उप-संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी सोमवारी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथील शिक्षण उप-संचालक प्राथमिक यांच्याकडे नियमबाह्य पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यासाठी भोयर यांच्या शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा सचिव मोहन ढोके, उपाध्यक्ष पी. आर.ठाकरे, प्रा. नितीन टाले,अमरावती विभागीय प्रसिद्धीप्रमुख अजयसिंह बिसेन, आशिष बोरकर, आकाश भोयर, सुमित वानखडे आदींनी शिक्षण संचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेत, शिक्षण उप-संचालकांनी आदेश दिले. शेखर भोयर यांच्या दोन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. शासननिर्णय २ जुलै २0१३ नुसार राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आवश्यकतेनुसार इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गांना मान्यता दिली होती; परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि एक किमी परिसरात त्याच माध्यमाचा वर्ग उपलब्ध आहे. अशा ठिकाणी पाचवा वर्ग जोडण्यात येऊ नये, तसेच ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे आणि ३ किमी परिसरामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आठवा वर्ग देण्यात येऊ नये. असे स्पष्ट आदेश शिक्षण उप-संचालक शरद गोसावी यांनी अमरावती विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना सोमवारी दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी त्यांच्या अधिपत्याखालील व खासगी व्यवस्थापनेच्या सर्व शाळांचा आढावा घेऊन एक संयुक्त प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवून नंतर शिक्षण संचालक शासनाकडे मान्यतेसाठी पाठवतात. इयत्ता पाचवी व आठवीचे नियमबाह्य जोडण्यात आलेले वर्ग बंद करण्यात यावे आणि पुन्हा असे वर्ग जोडण्यात येऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Akolaअकोलाeducationशैक्षणिकSchoolशाळा