शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

पाचवी, आठवीच्या वर्गाचा निर्णय शिक्षण समिती घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:48 PM

अकोला: जिल्हा परिषदेच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडल्याच्या मुद्यावर जि.प. शिक्षक संघटना आणि खासगी शैक्षणिक संस्था संचालक-पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले.

अकोला: जिल्हा परिषदेच्या शाळांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडल्याच्या मुद्यावर जि.प. शिक्षक संघटना आणि खासगी शैक्षणिक संस्था संचालक-पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत आरोप-प्रत्यारोप झाले. वर्ग जोडल्याने अनैसर्गिक स्पर्धेतून खासगी शाळांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे संस्था संचालक व खासगी शिक्षकांनी सांगितले. यावर वर्ग जोडण्याची प्रक्रिया शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या निर्णयानुसारच पार पाडण्यात आली असून, दर्जेदार शिक्षण मिळणाºया शाळांची निवड पालक करेल, असे प्रत्युत्तर जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. या मुद्यावर एकमत होत नसल्याने शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी यावर आता शिक्षण समितीच्या सभेत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. बैठकीत दोन्ही बाजूंच्या प्रत्येक पाच प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण समितीच्या सदस्य ज्योत्स्ना चोरे, प्रतिभा अवचार, मनोहर हरणे, गोपाल कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची जांभेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास खिल्लारे उपस्थित होते.असे झाले आरोप-प्रत्यारोपइयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्याच्या प्रक्रियेत ‘आरटीई’मधील तरतुदींचे पालन झाले नाही, असा आरोप विरोधक अर्थात खासगी शिक्षकांनी केला. या प्रक्रियेमुळे निर्माण होणाºया स्पर्धेतून खासगी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, असाही दावा विरोधकांमधून करण्यात आला. वर्ग जोडण्याच्या प्रक्रियेची मान्यता घेण्यात आली नसल्याचा दावा विरोधकांनी केला. ‘आरटीई’ची अंमलबजावणी करताना कोणत्याच घटकावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचा सूर विरोधकांनी आवळला. आरटीईनुसार वर्ग १ व ५ किमान ५ कि.मी.च्या, तर ६ ते ८ किमान ३ कि.मी.च्या अंतरात उपलब्ध असणे आवश्यक आहे. शासनाच्या २८ आॅगस्ट २०१५ नुसार वर्ग ५ वी व ८ वी ही नैसर्गिक वाढ असून, त्यासाठी शासनाची अंतराची अट नाही, असा दावा समर्थकांनी केला. २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानंतर सर्व रिट याचिका एकत्रित केल्यानंतर शासनाचा उपरोक्त निर्णय लागू झाला.जिल्हा परिषद शिक्षकांचा दमदार युक्तिवादजिल्हा परिषद शाळांना वर्ग ५ वी ८ वीचे वर्ग जोडण्याच्या समर्थनार्थ शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी मुद्देसूद माहिती सादर केली. सर्व शासन निर्णय, परिपत्रकांचे विश्लेषण केले. यात महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ते जव्वाद हुसेन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार, कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे शशिकांत गायकवाड, साने गुरुजी सेवा संघाचे ज्ञानेश्वर मांडेकर यांच्यासह प्रहार शिक्षक संघटनेचे शशांक टिकार यांचा समावेश होता.संयुक्त निवेदनास नकारशाळांना वर्ग ५ वी ८ वीचे वर्ग जोडण्याबाबत दोन्ही बाजंूनी संयुक्त निवेदन द्यावे, अशी सूचना सीईओ आयुष प्रसाद यांनी केली; मात्र संयुक्त निवेदनावरही एकमत होत नव्हते. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी एकत्र झालो असून, सर्वानुमते मध्यम मार्ग काढा, असे आवाहन त्यांनी केले; मात्र तरीही निर्णय होत नव्हता. अखेर दुसºया बैठकीला जायचे आहे, असे म्हणत सीईओ सभागृहातून बाहेर पडले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाAkola ZPअकोला जिल्हा परिषद