नवविवाहितेचा जळाल्याने मृत्यू
By Admin | Updated: August 30, 2016 01:17 IST2016-08-30T01:17:37+5:302016-08-30T01:17:37+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; तीन महिन्यांपुर्वी झाला होता विवाह.

नवविवाहितेचा जळाल्याने मृत्यू
शिरपूर जैन (जि. वाशिम), दि. २९: येथून जवळच असलेल्या पेनबोरी येथील १९ वर्षीय नवविवाहिता निलम विजय चतरकर हिचा २९ ऑगस्ट रोजी जळाल्याने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल माहेरच्या लोकांनी शंका उपस्थित केली आहे. शिरपूरपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या वाघी बु. येथील पांडुरंग श्रीराम जाधव यांच्या निलम नामक मुलीचा विवाह ३ महिन्यापूर्वी पेनबोरी येथील विजय चतरकर याच्याशी झाला होता. २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास निलम जळाल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी मंडळीला दिली. निलमला वाशिम येथे उपचारासाठी नेले असता तिचा मृत्यू झाला. विवाहानंतर अवघ्या तीन महिन्यातच निलमचा मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी व माहेरच्या मंडळींनी शंका उपस्थितीत केली.