शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

अकोला जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:10 PM

- संतोष येलकर अकोला : पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व पेरणी क्षेत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार ...

- संतोष येलकरअकोला : पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व पेरणी क्षेत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या छायेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ७०१.६ मिलीमीटर पाऊस पडला असून, एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, जमिनीतील आर्द्रता, भूजल पातळी व एकूण पेरणीच्या क्षेत्रापैकी पेरणीचे प्रत्यक्ष क्षेत्र यासंदर्भात कृषी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभाग इत्यादी यंत्रणांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ११ सप्टेंबर रोजी अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि पेरणी क्षेत्राचे प्रमाण विचारात घेता, जिल्ह्यातील अकोट आणि पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाचही तालुक्यांवर दुष्काळाची छाया असल्याचे वास्तव समोर येत आहे.दुष्काळाच्या छायेत असे आहेत पाच तालुके!पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व खरीप पेरणी क्षेत्राचे प्रत्यक्ष प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी प्रत्यक्ष पेरणी क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.- राजेश खवले,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ