शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

वायुसेनेच्या यशाचे राजकारण नको -  अबू आझमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 1:36 PM

लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.

अकोला: पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला व त्यानंतर वायुसेनेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये, या यशाचे राजकारणही करू नये, असे आवाहन करतानाच लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.अकोल्यातील जाफरी पार्क मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आ. अबू आझमी शुक्रवारी अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, की पुलवामा येथील घटना व लष्कराने केलेली यशस्वी कारवाई याचे सत्ताधारी पक्षाकडून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचा अभिमानच आहे; मात्र या कारवाईत जे दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगण्यात येते, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने सत्य समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वायुसेनेच्या कारवाईचे श्रेय कोणी घेऊ नये, युद्ध हा उपाय नसून, दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सै. मोहिन, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारुख, परवेज सिद्धिकी, महिला आघाडी प्रमुख माया चवरे यांच्यासह सपाचे पदाधिकारी बादशाह सेठ, सैयद अली व महेमूद खान उपस्थित होते. समविचारी पक्षांसोबत, अन्यथा स्वबळावर लढणार!भाजपच्या पराभवासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असून, यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांची कार्यशैली माहीत असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करतानाच काँग्रेस आघाडीने जागा न सोडल्यास स्वबळावर ४८ जागांवर लढणार, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणAbu Azmiअबू आझमी