कोरोनामुक्त गावासाठी जिल्हाधिकारी, सीइओंनी साधला सरपंचांसोबत संवाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:22+5:302021-05-07T04:19:22+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा ...

कोरोनामुक्त गावासाठी जिल्हाधिकारी, सीइओंनी साधला सरपंचांसोबत संवाद !
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी गुरुवारी ‘ऑनलाईन’ पद्धतीने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा कहर वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन तालुक्यातील विविध गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांसोबत ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’व्दारे संवाद साधला. गावांतील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती, कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण, कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना यासंदर्भात यावेळी करण्यात आली. कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासह कोरोनामुक्त गावासाठी गाव पातळीवर खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावांत कोरोना संसर्ग, रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसह कोरोनाविषयक नियमांची काटेकार अंमलबजावणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गावांचे सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी
काळजी घेण्याचा सल्ला !
गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन गर्दी होणार नाही, यासंदर्भात दक्षता घेणे तसेच लग्न समारंभात गर्दी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याचा सल्ला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी तीन तालुक्यातील संबंधित गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला.