शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

अकोला जिल्ह्यात हिवतापाचा उतरता आलेख;  चार वर्षांत रुग्ण संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:24 PM

जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.

ठळक मुद्देवर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते. २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे.यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत.

- अतुल जयस्वालअकोला: मनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बºयाच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. आरोग्याच्या दृष्टीने हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य ‘तयारी हिवतापास हरविण्याची’, हे आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडियम ओव्हेल यांचा समावेश आहे.यापैकी प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. वर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवतापमुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आशादायी चित्र आहे.पाचही जिल्ह्यांत आशादायी चित्रआरोग्यसेवा (हिवताप) अकोला मंडळातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये पाचही जिल्ह्यांमधून २० लाख ५५ हजार ४६ रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी २८५ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. यावर्षी रुग्णांची संख्या लक्षणीय घटून ती केवळ ३६ वर आली.गत चार वर्षांत हिवताप निर्मूलनात बºयाच अंशी यश आले आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविता येते. हिवतापाला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, डासांच्या चाव्यापासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.

- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा, (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य