शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST

सचिन राऊत अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन ...

सचिन राऊत

अकाेला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा गतवर्षीच्या काळात वाढलेला हैदाेस कमी करण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ॲक्शन प्लानच तयार केला आहे. या गुन्हेगारांचे कंबरडे माेडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र झाेपडपट्टीदादा नियंत्रण कायदा एमपीडीए तसेच जिल्ह्याच्या बाहेर थेट दाेन वर्षांसाठी हद्दपारीच्या कारवाईचे अस्त्र उगारले आहे. त्यानुसार गत ८ महिन्याच्या कालावधीत तब्बल २६ टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले असून, ९ गुंडांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.

राजकीय पदाधिकारी यांचे पाठबळ असल्याने शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी टाेळ्यांचे वर्चस्व माेठ्या प्रमाणात सुरू झाले हाेते. या टाेळ्यांनी माेठे भूखंड वादग्रस्त करीत त्यावर ताबा मिळवणे, घर खाली करणे यासह खंडणी, जबरी वसुली करणे, व्यापारी व उद्याेजकांना धमकावण्याचे प्रकार प्रचंड वाढले हाेते. या प्रकरणाच्या तक्रारी पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे झाल्यानंतर त्यांनी कशाचीही हयगय न करता गुन्हेगारी टाेळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी कारवाईचा धडाकाच लावला आहे. त्यानुसार अकाेला पाेलीस दलाने कधी नव्हे; एवढ्या माेठ्या कारवाया केलेल्या आहेत. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर २६ टाेळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली असून, यामधील गुन्हेगारांचा आकडा हा तब्बल १००च्या वर असल्याची माहिती आहे, तर झाेपडपट्टीदादांना त्यांची जागा दाखविण्यासाठी एमपीडीएच्या कारवाया करून त्यांनाही पळता भुई थाेडी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टाेळ्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती आहे. थेट दाेन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपारी, एक वर्षांसाठी कारागृहात स्थानबध्दता आणि एमपीडीएच्या कारवायांचा सपाटा सुरू असल्याने गुन्हेगारांनी त्यांचे मार्ग बदलल्याचे वास्तव आहे.

जुने शहरातील टाेळीवर एसपींचा वाॅच

जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांच्या टाेळ्या गत काही दिवसांपासून सक्रीय झाल्या आहेत. त्यांच्यावर खुद्द पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचाच वाॅच असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पाेलीस अधीक्षक या टाेळीचेही कंबरडे माेडण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जुने शहरातील या टाेळीचा हैदाेस लक्षात घेता पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा पीडितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

९ प्रकरणात एमपीडीएचे अस्त्र उगारले

पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर रूजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या सर्वाधिक एमपीडीएच्या कारवाया केलेल्या आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी त्यांनी एमपीडीएच्या ९ कारवाया केल्या असून, यासाेबतच गुंडांच्या २६ टाेळ्या जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करून गुन्हेगारांची हयगय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

आणखी दाेन टाेळ्या हद्दपार

रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणाऱ्या दाेन टाेळ्या बुधवारी हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नीलेश विजय बाेरकर (रा. नवीन तारफैल) आणि पियुष पंढरीनाथ माेडक (रा. देशमुख फैल) या दाेघांच्या टाेळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. रामदास पेठ पाेलिसांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दाेन्ही टाेळ्यांना हद्दपार करण्याचा आदेश बुधवारी दिला.