शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जलसंपदा विभाग रिकामा; वरिष्ठ अभियंत्यांसह ९३१ जण एकाच दिवशी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 11:35 AM

८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत.

- राजरत्न सिरसाटअकोला: राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यासह ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. यात वरिष्ठ अनुभवी अभियंत्यांचा समावेश आहे.जलसंपदा (पाटबंधारे) विभागात राज्यात काम करणाऱ्यांमध्ये ८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत. नवीन भरती नगण्य आहे. असे असताना आजमितीस उपलब्ध असलेल्या या अभियंत्यांपैकी ८९० अभियंते हे सेवानिवृत्त झाले. इतर कर्मचारी मिळून हा आकडा ९३१ इतका आहे. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये तीन अधीक्षक अभियंता, ६१ कार्यकारी अभियंता, २०७ उपअभियंता आणि ६२० कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. म्हणजेच आजमितीस या विभागात या अभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. लवकरच यातील आणखी काही वरिष्ठ अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत. सद्यस्थितीत नवीन भरती नगण्य आहे. विदर्भात मोठे, मध्यम तसेच बॅरेजची कामे रखडली आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर कनिष्ठ अभियंत्यांना मार्गदर्शन करायला अनुभवी वरिष्ठ लागतात. तसेच प्रकल्पाची कामे, नियोजन, डिझाइन अशी अनेक तांत्रिक कामे करावी लागतात. प्रकल्प बांधणे हेदेखील सर्वात महत्त्वाचे काम असल्याने यासाठी अनुभवी अभियंते लागतात, असे या विभागातील तज्ज्ञांचे मत आहे. गतवर्षी मोजक्या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. यावर्षी ‘कोविड-१९’मुळे नवीन भरती होईल की नाही, यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. नवीन भरतीमध्ये काही थेट कार्यकारी अभियंते मिळतील; पण त्यांनाही अनुभव घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे सेवानिवृत झालेल्या किंवा होणाºया अनुभवी अभियंत्यांना एक-दोन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. अगोदरच्या शासनाने हे केले आहे. विदर्भ सिंचन विकास मंडळावर कार्यकारी संचालक याच पद्धतीने घेण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला. पाटबंधारे विभागाचे राज्यातील ८९० वरिष्ठ अभियंत्यासह इतर कर्मचारी मिळून ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे अनुभवी अभियंत्यांची कमतरता निर्माण झाली आहे.-मनोज बोंडे,अध्यक्ष,म. रा. राजपत्रित अभियंता संघटना,अमरावती विभाग.

 

टॅग्स :Akolaअकोला