शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

चमकी तापाचा राज्यातही धोका : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:09 PM

चमकी तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.

अकोला : उत्तर प्रदेशमध्ये चमकी या तापाने थैमान घातले असून, १२५ पेक्षा जास्त बालकांचा या तापामुळे बळी गेला आहे. बदलत्या हवामानासोबतच मध्यप्रदेशमार्गे राज्यात प्रवेश करणाºया प्रवाशांच्या माध्यमातून या तापाचा प्रसार राज्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, इतर राज्यातून येणाºया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे.उत्तर प्रदेशात थैमान घालणारा ‘चमकी’ (कावासाकी) हा ताप प्रामुख्याने जपानमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार आहे. वैद्यकीय भाषेत या तापाला एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम म्हटले जात असून, त्याला मेंदुचा तापदेखील म्हटल्या जाते. गर्मी किंवा उष्णतेच्या वातावरणात ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना या तापाचा सर्वाधिक धोका जाणवतो. गत महिनाभरातच उत्तर प्रदेशात या तापाचे १२५ पेक्षा जास्त बळी गेले असून, महाराष्ट्रात वसई येथे एका ८ महिन्याच्या बालकालाही या तापाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या माध्यमातूनदेखील हा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परराज्यातून येणाºया विशेषत: आजारी प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र स्थानिक आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाढती उष्णता, लांबणीवर पडलेला पाऊस अन् वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे या तापाचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सतर्कता बाळगत ० ते १५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.लक्षणे

  • अतिताप
  • उलट्या
  • डोकेदुखी
  • उष्णतेमुळे चिडचिडपणा
  • गोंधळ
  • मान आणि पाठ दुखणे
  • मळमळ
  • बोलण्यात आणि ऐकताना त्रास होणे
  • स्मृती कमजोर होणे
  • गंभीर स्थितीत लकवा किंवा कोमात जाण्याची शक्यता

अशी आहेत कारणे

  • डोक्यात ताप गेल्याने हा आजार होतो
  • मेंदूच्या पेशी आणि नसांना सूज आल्यास मेंदूचा ताप येतो.
  • इंसेफलाइटिस बॅक्टेरिया, फुंगी, परजीवी, रसायन, टॉक्सिनमुळे देखील हा ताप होण्याची शक्यता आहे.

मेंदूत ताप गेल्याने चमकी ताप होण्याची शक्यता असते. मुख्यत: उष्णतेमुळेदेखील हा ताप होऊ शकतो. राज्यात अद्याप हा आजार पसरला नसला, तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य