शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दांडी मारणारे अधिकारी-कर्मचारी धास्तावलेः एसडीओचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST

अकोटः अकोट शहरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परवानगीशिवाय मुख्यालयी सोडू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावले ...

अकोटः अकोट शहरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परवानगीशिवाय मुख्यालयी सोडू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावले आहेत. आढावा बैठकीत अधिकारी हजर नसल्याने निर्णय घेता आला नाही, या गैरहजर प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी या प्रमुख अधिकाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे सक्तीचे आदेश बजावले आहेत. या आदेशानुसार, विविध विभागांतील अप-डाउन करणाऱ्या दांडीबाज अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असताना, जबाबदारी असलेले अधिकारी या काळात मुख्यालयी हजर न राहता, दांडी मारतात, असाच काहीसा अनुभव अकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना आला. त्यामुळे त्यांनी थेट सक्तीचे आदेश काढले.

अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली. सद्यस्थितीत अकोट शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अकोट शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. काही विषयांचा आढावा घेऊन अकोट शहरात पूर्णतः पुढील पाच दिवसांकरिता संचारबंदी लावण्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करणे गरजेचे होते, परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आढावा घेता आला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमण कालावधीत परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यालयात सादर करण्यात येईल, असा आदेश बजावला आहे. अकोट शहरातील आधीच अधिकारी कर्तव्यावर रुजू होण्यापासून तर कर्तव्य पार पाडण्यासाठी उत्सुक नसतात. अनेक अधिकारी तर शासनाने अकोटला बदली करताच रुजू न होताच अकोट टाळतात. त्यामुळे अकोटमध्ये शासनाच्या प्रत्येक विभागात अधिकारी-कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. कोरोना काळात तर आरोग्यसेवा सक्षम असणे आवश्यक असते. मात्र, अकोट ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवाच सलाइनवर आहे. नगरपरिषद व महसूल विभागासारखा आरोग्य विभाग कोरोना काळात सक्रिय नसल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत. या विभागावर वरिष्ठ अधिकारी यांचा अंकुश असणे लोकहितासाठी पोषक ठरणारे आहे.

......चौकट....

कोरोना काळात अतिरेक टाळावा!

कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी संरक्षण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वतःचे कर्तव्य समजून शासनाला सहकार्य करणे काळाजी गरज आहे. मात्र, या उपाययोजना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणे गरजेच असताना, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखालील अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत अतिशयोक्ती करत आहेत. त्यामुळे अशामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी नागरिकांचे मानसिक संतुलन बिघडत अनेक अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत केवळ कोरोना जनजागृतीवर भर दिल्यास नागरिकांच्या मानसिक स्थितीने स्वयंस्फूर्तीने मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.