शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

दांडी मारणारे अधिकारी-कर्मचारी धास्तावलेः एसडीओचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST

अकोटः अकोट शहरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परवानगीशिवाय मुख्यालयी सोडू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावले ...

अकोटः अकोट शहरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना परवानगीशिवाय मुख्यालयी सोडू नये, अन्यथा कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावले आहेत. आढावा बैठकीत अधिकारी हजर नसल्याने निर्णय घेता आला नाही, या गैरहजर प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी या प्रमुख अधिकाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे सक्तीचे आदेश बजावले आहेत. या आदेशानुसार, विविध विभागांतील अप-डाउन करणाऱ्या दांडीबाज अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्नशील असताना, जबाबदारी असलेले अधिकारी या काळात मुख्यालयी हजर न राहता, दांडी मारतात, असाच काहीसा अनुभव अकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना आला. त्यामुळे त्यांनी थेट सक्तीचे आदेश काढले.

अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली. सद्यस्थितीत अकोट शहरात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अकोट शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. काही विषयांचा आढावा घेऊन अकोट शहरात पूर्णतः पुढील पाच दिवसांकरिता संचारबंदी लावण्याबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करणे गरजेचे होते, परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आढावा घेता आला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमण कालावधीत परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यालयात सादर करण्यात येईल, असा आदेश बजावला आहे. अकोट शहरातील आधीच अधिकारी कर्तव्यावर रुजू होण्यापासून तर कर्तव्य पार पाडण्यासाठी उत्सुक नसतात. अनेक अधिकारी तर शासनाने अकोटला बदली करताच रुजू न होताच अकोट टाळतात. त्यामुळे अकोटमध्ये शासनाच्या प्रत्येक विभागात अधिकारी-कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. कोरोना काळात तर आरोग्यसेवा सक्षम असणे आवश्यक असते. मात्र, अकोट ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवाच सलाइनवर आहे. नगरपरिषद व महसूल विभागासारखा आरोग्य विभाग कोरोना काळात सक्रिय नसल्याचे अनुभव नागरिकांना येत आहेत. या विभागावर वरिष्ठ अधिकारी यांचा अंकुश असणे लोकहितासाठी पोषक ठरणारे आहे.

......चौकट....

कोरोना काळात अतिरेक टाळावा!

कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी संरक्षण उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वतःचे कर्तव्य समजून शासनाला सहकार्य करणे काळाजी गरज आहे. मात्र, या उपाययोजना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणे गरजेच असताना, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखालील अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत अतिशयोक्ती करत आहेत. त्यामुळे अशामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याऐवजी नागरिकांचे मानसिक संतुलन बिघडत अनेक अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत केवळ कोरोना जनजागृतीवर भर दिल्यास नागरिकांच्या मानसिक स्थितीने स्वयंस्फूर्तीने मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.