शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पिकांचे नुकसान: दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:43 IST

दुसºया टप्प्यातील मदतनिधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत वितरीत करण्यात आलेली २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, दुसºया टप्प्यातील मदतनिधी शासनामार्फत अद्यापही जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही. त्यामुळे दुसºया टप्प्यातील मदत केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम शासनामार्फत वितरीत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला २५ टक्के मदतनिधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, दुसºया टप्प्यातील मदत निधी अद्याप शासनामार्फत जिल्हा स्तरावर प्राप्त झाला नाही, त्यामुळे दुसºया टप्प्यातील मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार आणि मदतीची रक्कम बँक खात्यात केव्हा जमा होणार, यासंदर्भात शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी