शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पीक नुकसानीचे अर्ज केवळ २२ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:00 IST

Crop insurance : केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला असतानाच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी शनिवारपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात विहीत मुदतीत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. पीक विम्याच्या लाभासाठी पिकांचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या मुदतीत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानाची सूचना किंवा तक्रार अर्ज संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीसंदर्भात अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ जुलैपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे पीक नुकसानाचे अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा काढलेले शेतकरी आणि पीक

नुकसानीच्या अर्जांची अशी आहे संख्या!

तालुका             शेतकरी            अर्ज

अकोला             ४२०८४            ८७१०

बार्शीटाकळी २०२७३ ३१८५

मूर्तिजापूर             ३१२६३            २२८९

अकोट             ३०४७४             ८००

तेल्हारा             २००८४             १७४२

बाळापूर             ३२८५२             ५३७३

पातूर             १३५३४             ३०

.........................................................................

एकूण             १९०५२४             २२९२९

 

प्राथमिक अहवालानुसार ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी सांगितले.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीसंदर्भात सूचना अर्ज विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत स्वीकारण्यात आले. विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे सूचना अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.

-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाFarmerशेतकरी