शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पीक नुकसानीचे अर्ज केवळ २२ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:00 IST

Crop insurance : केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला असतानाच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी शनिवारपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात विहीत मुदतीत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. पीक विम्याच्या लाभासाठी पिकांचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या मुदतीत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानाची सूचना किंवा तक्रार अर्ज संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीसंदर्भात अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ जुलैपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे पीक नुकसानाचे अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा काढलेले शेतकरी आणि पीक

नुकसानीच्या अर्जांची अशी आहे संख्या!

तालुका             शेतकरी            अर्ज

अकोला             ४२०८४            ८७१०

बार्शीटाकळी २०२७३ ३१८५

मूर्तिजापूर             ३१२६३            २२८९

अकोट             ३०४७४             ८००

तेल्हारा             २००८४             १७४२

बाळापूर             ३२८५२             ५३७३

पातूर             १३५३४             ३०

.........................................................................

एकूण             १९०५२४             २२९२९

 

प्राथमिक अहवालानुसार ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी सांगितले.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीसंदर्भात सूचना अर्ज विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत स्वीकारण्यात आले. विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे सूचना अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.

-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाFarmerशेतकरी