शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

कासोधा परिषद; आंदोलनात जिंकली; चर्चेत हरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 6:30 PM

आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या गेल्या वर्षी झालेल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादन शेतकऱ्याची ‘कासोधा’ परिषद झाली. यशवंत सिन्हा सारखे देशव्यापी व थेट पंतप्रधान मोदींना भिडणारे नेतृत्व या आंदोलनाला मिळाल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले. अकोल्यात कधी नव्हे तर भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा देत सहभाग घेतला. सरकारवर दबाव वाढला व थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले व आंदोलनाची सांगता झाली. मात्र वर्षभर या मागण्यांकडे सरकारने ढुंकनही पाहिले नाही त्यामुळे शेतकरी जागर मंचने दूसºया ‘कासोधा’ परिषदेची हाक देऊन वातावरण निर्मिती केली. यावेळी यशवंत सिन्हांच्या जोडीला शत्रुघ्न सिन्हा व आपच्या नेत्यांची भर पडली मात्र जुन्याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी जुनाचा फंडा वापरण्याचा प्रयत्न झाला अन् अखेर पुन्हा आश्वासनांची भेेंडोळी हातात घेऊन परिषदेच्या आंदोलनाची सांगता झाली. कासोधा परिषदेच्या निमित्ताने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या प्रत्यक्षात मात्र आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.यशंवत सिन्हा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या गेल्यावर्षी तीन दिवस झालेले हे आंदोलन यावर्षी अवघ्या तीन तासात आटोपले. सिन्हांसह शेकडो आंदोलक पोलिस कवायत मैदानात ठाण मांडून बसले. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता,यावेळी प्रशासनानेही आधीच तयारी केली होती. तगडा बंदोबस्त अन् गावागावातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावून आधीच धमकाविण्यात आले होते मात्र तरीही परिषदेवर फारसा फरक पडला नाही. दूसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या परिषदेसाठी जागर मंचला गावागावात जवळपास दोनशे बैठका पुर्वतयारीसाठी घ्याव्या लागल्या होत्या यावेळी मात्र एवढया मोठया प्रमाणात बैठकांची गरज भासली नाही कारण शेतकºयांना ‘कासोधा’ आंदोलनाची ओळख झाली होती. तर यावर्षी दूष्काळाची पृष्ठभूमी लक्षात घेता मागील आश्वासनांचा जाब व शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती जागर मंचाने तयार केली असेल अशीच सर्वसामान्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाषणांचा तोच सुरू,तेच आरोप व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोच ठिय्या याची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनानेही मागील प्रमाणचे अश्वासनांचे लेखी पत्र देऊन ‘बोळवण’ करण्याची पुनरावृत्ती केली.

टॅग्स :AkolaअकोलाKasodha Parishadकासोधा परिषद