शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे दाेन कर्मचारी पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:33 IST

अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल ...

अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष

अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केल्यानंतरही अकाेलेकर याकडे कानाडाेळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चाचणीसाठी पुढाकार घ्या!

अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी, आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

गांधी चाैकातील अतिक्रमकांना हुसकावले!

अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. आयुक्त निमा अराेरा यांनी १५ फेब्रुवारीपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. यादरम्यान, बुधवारी गांधी चाैकात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमकांना हुसकाविण्याची कारवाइ करण्यात आली. पुन्हा दुकाने थाटल्यास साहित्य जप्त केले जाणार आहे.

नगराेत्थान याेजनेंतर्गत निधी प्राप्त

अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजने अंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून, एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित कामे निकाली काढली जाणार आहेत. तसे प्रस्ताव नगरसेवकांनी सादर केले असून, मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.

रस्त्यांची झाडपूस नाही; वाहनधारक त्रस्त

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावले जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

टायमर बिघडले; पथदिवे बंद

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद, तर दिवसा सुरू राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे. या प्रकाराची आयुक्त निमा अराेरा यांनी दखल घेण्याची मागणी हाेत आहे.

मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता

अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी नियमित साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. या प्रकाराकडे आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.