शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मनपाचे दाेन कर्मचारी पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:33 IST

अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल ...

अकाेलेकरांचे जमावबंदीकडे दुर्लक्ष

अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केल्यानंतरही अकाेलेकर याकडे कानाडाेळा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चाचणीसाठी पुढाकार घ्या!

अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी, आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

गांधी चाैकातील अतिक्रमकांना हुसकावले!

अकाेला : शहरातील मुख्य रस्त्यांलगत अतिक्रमण थाटल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. आयुक्त निमा अराेरा यांनी १५ फेब्रुवारीपासून शहरात अतिक्रमण हटाव माेहीम सुरू केली. यादरम्यान, बुधवारी गांधी चाैकात रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमकांना हुसकाविण्याची कारवाइ करण्यात आली. पुन्हा दुकाने थाटल्यास साहित्य जप्त केले जाणार आहे.

नगराेत्थान याेजनेंतर्गत निधी प्राप्त

अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजने अंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून, एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित कामे निकाली काढली जाणार आहेत. तसे प्रस्ताव नगरसेवकांनी सादर केले असून, मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.

रस्त्यांची झाडपूस नाही; वाहनधारक त्रस्त

अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावले जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

टायमर बिघडले; पथदिवे बंद

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद, तर दिवसा सुरू राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे मनपाच्या विद्युत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे. या प्रकाराची आयुक्त निमा अराेरा यांनी दखल घेण्याची मागणी हाेत आहे.

मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता

अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी नियमित साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधी पसरली आहे. या प्रकाराकडे आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.