शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी साखरपुड्यातच उरकला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 19:36 IST

कोरोनाचा धसका: गर्दी टाळण्यासाठी साखरपुड्यातच उरकला विवाह

- संतोष गव्हाळे

हातरुण (अकोला) : चीनमधील कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विवाह सोहळ्याला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून होणारी विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्याकरिता रविवारी अश्विनी आणि मनोज यांनी आदर्श विवाह करून समाजाला एक आगळावेगळा संदेश दिला आहे.       बाळापूर तालुक्यातील सस्ती येथील रघुनाथ राऊत यांची मुलगी अश्विनी यांना पाहण्यासाठी खामगाव येथील भागवत सुलतान व त्यांचा मुलगा मनोज आले होते. मुलगी पाहण्याच्या कर्यक्रमात एकमेकांची पसंती झाली आणि मुलगी पाहताच आपल्याला कशाचीदेखील अपेक्षा नसून आपण लगेच साखरपुडा करून घेऊन असे काही पाहुण्यांनी सांगितले. त्यांनतर साखरपुड्याची तयारी सुरू झाली. कोरोना विषाणूमुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले असून शासनाने शाळा, महाविद्यालये, जत्रा आणि यात्रा व चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. विवाह सोहळा आयोजित केल्यास मोठी गर्दी होणार आहे अशावेळी एखादा कोरोना संशयित रुग्ण विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून दोन्ही कडील मंडळी सोबत बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी चर्चा केली. त्यानंतर साध्या पद्धतीने मनोज सुलतान आणि अश्विनी राऊत विवाह बंधनात अडकले. सध्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ पाहण्याचे काम चालू असून लग्नसराई सुरू झाली आहे. बराच काळ विवाह जमवण्यात तसेच विवाहाचे नियोजन करण्यात दिवस जातात. सोयरीक पुस्तकेतून माहिती घेऊन सुलतान व राऊत परिवाराने  मुला व मुलीच्या पसंतीने आदर्श लग्न लावून दिले. हा विवाह सोहळा अकोला येथे घरघूती स्वरूपात रविवारी दुपारी पार पडला.      बीई झालेले नवरदेव मनोज सुलतान आणि बी. सी. ए. झालेली अश्विनी राऊत दोघेही पुणे येथे नामांकित कंपनीत नोकरीला आहेत. कोरोना विषाणू पासून खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनीही आदर्श लग्न करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

आजच्या विज्ञान युगातील हायटेक जमान्यात सोशल मीडियातून कोरोना विषाणू बद्दल मोठ्या प्रमाणात माहितीची देवाण आणि घेवाण होत आहे. लग्न सोहळ्यास एखादा कोरोना संशयित रुग्ण उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागरूकता म्हणून साध्या पद्धतीने मनोज व अश्विनीचा विवाह झाला. विशेष म्हणजे हा विवाह जुळवण्यात कोणीही मध्यस्थ नाही.       

-  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस