शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 3:49 PM

२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला: भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी सध्या काँग्रेस पुढाकार घेत असून, लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकींचेही नियोजन पक्षपातळीवर केले जात आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या विधानसभेची निवडणूक काँग्रसने स्वबळावर लढविली होती. यावेळी २८७ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ ४२ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. या निवडणुकीत ७१ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या ७१ मतदारसंघांमध्ये राष्टÑवादीने सात जागांवर विजय मिळविला होता, तर ६४ मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष राष्टÑवादीपेक्षा आघाडीवर होता. तसेच काँग्रेस पक्ष तिसºया क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांची संख्या ५३ असून, त्यामध्ये ३३ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मते काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली होती तर काँग्रेस चवथ्या क्रमांकावर असलेल्या ६९ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मताधिक्य काँग्रेसने घेतले होते. अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघात मिळालेल्या मतांची राष्टÑवादीला मिळालेल्या मतांसोबत तुलना करून विश्लेषण तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची आघाडी असताना २००४ व २००९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे १५७ व १७० जागा लढल्या होत्या. त्यामुळे १६१ मतदारसंघ हे राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अनुकूल असल्याचे गणित मांडले जात आहे. या गणिताच्या आधारावरच राष्टÑवादी काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा केली जाणार असून, त्यामध्येच मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणते मतदारसंघ सोडले जातील, हे ठरविले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मागील निवडणूक निकालाचे विश्लेषण अन् आता बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन जागांची अदलाबदल होऊ शकते, तसेच मित्रपक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघांचाही विचार करून काँग्रेस जागा वाटपाबाबत वाटाघाटी करेल. आकडा कमी-जास्त होऊ शकतो कारण भाजपा विरोधात एकत्र येणे हे जास्त महत्त्वाचे आहे.- आ. हर्षवर्धन सपकाळ, अ.भा. सरचिटणीस काँग्रेस.

यापूर्वीच्या तीनही विधानसभेच्या निवडणुकीचा फार्म्युला अमलात आणला तरीही काँग्रेसला १६१ जागा अनुकूल ठरतात. या संदर्भात प्रदेश कार्यालयात चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे वाटाघाटीच्या वेळी वस्तुस्थितीला धरून जागांची मागणी पक्षाकडून केली जाईल. - डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण