शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:49 IST

२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला: भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी सध्या काँग्रेस पुढाकार घेत असून, लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकींचेही नियोजन पक्षपातळीवर केले जात आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या विधानसभेची निवडणूक काँग्रसने स्वबळावर लढविली होती. यावेळी २८७ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ ४२ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. या निवडणुकीत ७१ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या ७१ मतदारसंघांमध्ये राष्टÑवादीने सात जागांवर विजय मिळविला होता, तर ६४ मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष राष्टÑवादीपेक्षा आघाडीवर होता. तसेच काँग्रेस पक्ष तिसºया क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांची संख्या ५३ असून, त्यामध्ये ३३ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मते काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली होती तर काँग्रेस चवथ्या क्रमांकावर असलेल्या ६९ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मताधिक्य काँग्रेसने घेतले होते. अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघात मिळालेल्या मतांची राष्टÑवादीला मिळालेल्या मतांसोबत तुलना करून विश्लेषण तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची आघाडी असताना २००४ व २००९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे १५७ व १७० जागा लढल्या होत्या. त्यामुळे १६१ मतदारसंघ हे राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अनुकूल असल्याचे गणित मांडले जात आहे. या गणिताच्या आधारावरच राष्टÑवादी काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा केली जाणार असून, त्यामध्येच मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणते मतदारसंघ सोडले जातील, हे ठरविले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मागील निवडणूक निकालाचे विश्लेषण अन् आता बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन जागांची अदलाबदल होऊ शकते, तसेच मित्रपक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघांचाही विचार करून काँग्रेस जागा वाटपाबाबत वाटाघाटी करेल. आकडा कमी-जास्त होऊ शकतो कारण भाजपा विरोधात एकत्र येणे हे जास्त महत्त्वाचे आहे.- आ. हर्षवर्धन सपकाळ, अ.भा. सरचिटणीस काँग्रेस.

यापूर्वीच्या तीनही विधानसभेच्या निवडणुकीचा फार्म्युला अमलात आणला तरीही काँग्रेसला १६१ जागा अनुकूल ठरतात. या संदर्भात प्रदेश कार्यालयात चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे वाटाघाटीच्या वेळी वस्तुस्थितीला धरून जागांची मागणी पक्षाकडून केली जाईल. - डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण