शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

विधानसभेसाठी काँग्रेसची १६१ मतदारसंघांवर दाव्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:49 IST

२००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अकोला: भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करण्यासाठी सध्या काँग्रेस पुढाकार घेत असून, लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकींचेही नियोजन पक्षपातळीवर केले जात आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकींचा अभ्यास करून काँग्रेसला १६१ जागांवर स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट होत असल्याने आघाडीमध्ये १६१ जागांवर दावा करण्याची तयारी पक्षाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या विधानसभेची निवडणूक काँग्रसने स्वबळावर लढविली होती. यावेळी २८७ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ ४२ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. या निवडणुकीत ७१ मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या ७१ मतदारसंघांमध्ये राष्टÑवादीने सात जागांवर विजय मिळविला होता, तर ६४ मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष राष्टÑवादीपेक्षा आघाडीवर होता. तसेच काँग्रेस पक्ष तिसºया क्रमांकावर राहिलेल्या मतदारसंघांची संख्या ५३ असून, त्यामध्ये ३३ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मते काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली होती तर काँग्रेस चवथ्या क्रमांकावर असलेल्या ६९ मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघात राष्टÑवादीपेक्षा जास्त मताधिक्य काँग्रेसने घेतले होते. अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघात मिळालेल्या मतांची राष्टÑवादीला मिळालेल्या मतांसोबत तुलना करून विश्लेषण तयार करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाची आघाडी असताना २००४ व २००९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे १५७ व १७० जागा लढल्या होत्या. त्यामुळे १६१ मतदारसंघ हे राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अनुकूल असल्याचे गणित मांडले जात आहे. या गणिताच्या आधारावरच राष्टÑवादी काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा केली जाणार असून, त्यामध्येच मित्रपक्षांना कोणाच्या कोट्यातून कोणते मतदारसंघ सोडले जातील, हे ठरविले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मागील निवडणूक निकालाचे विश्लेषण अन् आता बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन जागांची अदलाबदल होऊ शकते, तसेच मित्रपक्षांची ताकद असलेल्या मतदारसंघांचाही विचार करून काँग्रेस जागा वाटपाबाबत वाटाघाटी करेल. आकडा कमी-जास्त होऊ शकतो कारण भाजपा विरोधात एकत्र येणे हे जास्त महत्त्वाचे आहे.- आ. हर्षवर्धन सपकाळ, अ.भा. सरचिटणीस काँग्रेस.

यापूर्वीच्या तीनही विधानसभेच्या निवडणुकीचा फार्म्युला अमलात आणला तरीही काँग्रेसला १६१ जागा अनुकूल ठरतात. या संदर्भात प्रदेश कार्यालयात चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे वाटाघाटीच्या वेळी वस्तुस्थितीला धरून जागांची मागणी पक्षाकडून केली जाईल. - डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटी

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण