शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

 सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 6:39 PM

राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. यातील अनेक शिफारशींपैकी लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी ग्राम पातळीवर मंडळ, समित्या स्थापन करू न लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे. आता प्रति घनमीटर पाण्याची उत्पादकता वाढविणे हे खरे काम आहे. तद्वतच पाणी व्यवस्थापन काळाची गरज आहे. पाण्याची वाढती गरज बघता भुपृष्ठावर जलसाठे वाढवावे लागणार आहेत. तद्वतच मूलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल. लोकांचे राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे. शेती, उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते, याचा ताळेबंद, हिशेब ठेवावा लागणार आहे.नद्या, ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा, घाण टाकणे टाळले पाहिजे, नद्यांच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे, त्यासाठीची जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी शहर ते ग्रामपातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या, या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमार्फत होणे गरजेचे आहे. व्यापक स्वरू पात जनजागृती होईल. सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही यानुषंगाने काम होत आहे; परंतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची. ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू शकलो. यासह आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे. शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना गती मिळाली. पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे काळाजी गरज आहे, कालव्याद्वारे होणाºया सिंचनामध्ये वहन व्यय कमीत कमी व्हावे, त्याकरिता आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन व्हावे, त्याकरिता कमी पाण्यामध्ये येणाºया पीक पद्धतीचा स्वीकार करणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.खारपाणपट्टा हा विदर्भाला शाप म्हणतात; परंतु ही निसर्गाची देणगी असून, येथे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास खारपाणपट्ट्याचा हा भूभाग सुजलाम् सुफलाम् होईल. ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीत’ (पीडीएन) दोष असल्याने या पद्धतीद्वारे पाणी सोडल्यास शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे या प्रणालीतील दोष दूर करावा, लागणार आहे. यावर निष्कर्ष काढण्यात आले असून, या अंमलबजावणीसाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.

 सिंचन परिषदेत पाण्याविषयी दोन दिवस मंथन होऊन महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले. अभ्यासपूर्ण निर्णय झाले. निष्कर्षाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.- डॉ. माधवराव चितळे,आंतरराष्टÑीय जलतज्ज्ञ,पुणे

 

टॅग्स :Akolaअकोला