शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाच्या तुलनेत मिळणारी मदत अत्यंत तोकडी; शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:45 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देगारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत गत १४ फेबु्रवारीला मदत जाहीर करण्यात आली. जिरायती क्षेत्रातील पीक नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये आणि बागायती क्षेत्रातील नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत . जिरायती क्षेत्रातील हरभरा व गहू या पिकांच्या पेरणी, बियाणे, खते, फवारणी व काढणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये शेतकºयांना खर्च करावा लागला.

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली; मात्र पीक नुकसानाच्या तुलनेत मिळणारी मदत अत्यंत तोकडी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमध्ये उमटत आहेत.गत ११ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत गत १४ फेबु्रवारीला मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिरायती क्षेत्रातील पीक नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये आणि बागायती क्षेत्रातील नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिरायती क्षेत्रातील हरभरा व गहू या पिकांच्या पेरणी, बियाणे, खते, फवारणी व काढणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये शेतकºयांना खर्च करावा लागला. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि त्या तुलनेत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत लक्षात घेता, पीक नुकसानाच्या तुलनेत मदत अत्यंत तोकडी असल्याचा सूर गारपीटग्रस्त शेतकऱ्यां मध्ये उमटत आहे.जिरायती क्षेत्रात रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांच्या पेरणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये खर्च करावा लागला. त्या तुलनेत अवकाळी पाऊस व गारपिटीने पीक नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे ही मदत नसून, शेतकºयांची थट्टा आहे.-शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणHailstormगारपीट