शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शेतमाल घरात; शेतकरी पेचात; कपाशी, सोयाबीन, तुरीचे दर घसरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:16 PM

अकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

- संतोष येलकरअकोला: कपाशी, सोयाबीन व तुरीचे दर घसरल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून आहे. गरज भागविण्यासाठी कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा पेच शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीत पिकांचे उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतमालास चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून करण्यात येत असतानाच, गत महिन्याच्या तुलनेत कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी शेतमालाच्या दरात प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर घसरण झाली आहे. शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांच्या घरात कपाशी, सोयाबीन आणि तूर इत्यादी शेतमाल अद्याप पडून आहे. शेतमालाच्या दरात वाढ होत नसल्याने, गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात घरातील शेतमाल विकण्याची वेळ आता शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य दर केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकºयांसमोर गरज भागविण्यासाठी मिळणाºया कमी दरात शेतमाल विकावा की नाही, असा निर्माण झाला आहे.

महिनाभरापूर्वी आणि आता असे आहेत शेतमालाचे दर!महिनाभरापूर्वी कपाशीला प्रतिक्विंटल ५ हजार ९०० रुपये दर मिळत होता. आता ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ३ हजार ९०० रुपये होते. आता ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. तुरीचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये होते. आता ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळत आहे.कमी भाव मिळत असल्याने कपाशी, सोयाबीन व तूर घरात पडून आहे. चांगला भाव मिळेल या अपेक्षेने परिस्थिती नसताना शेतमाल घरात ठेवला आहे. परंतू भाव मिळत नसल्याच्या परिस्थितीत गरज भागविण्यासाठी आता कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ आली आहे.-शिवाजी भरणेशेतकरी, रामगाव, ता.अकोला.महिनाभरापूर्वी कापसाला प्रती क्विंटल ६ हजार रुपयांपर्यत भाव मिळाला.आता कापसाला प्रती क्विंटल ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कमी भाव मिळत असल्याने कापूस घरात पडून आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-लक्ष्मी गुणवंत खोबरखेडेमहिला शेतकरी, खोबरखेड.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी