शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिलासादायक....दिल्लीच्या कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:47 PM

उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला.

ठळक मुद्देवाडेगाव येथून ३१ मार्च रोजी १८ जणांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता.उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला.

अकोला : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. मात्र, वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ संधिग्ध रुग्णांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. या सर्वांच्या वैद्यकीय अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथून ३१ मार्च रोजी १८ जणांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, उर्वरीत ९ जणांच्या अहवालाकडे लक्ष लागून असतानाच वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ संधिग्ध रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शनिवारी त्यात आणखी दोघांची भर पडल्याने पातुर येथील संधिग्ध रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. शिवाय, तेल्हारा तालुक्यातीलही दोघांना संधिग्ध रुग्ण म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.१८ जणांचे ‘स्वॅब’ पाठविले नागपूरलाआयसोलेशन कक्षात दाखल कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांपैकी १८ जणांचे ‘स्वॅब’ शनिवारी सकाळीच तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. यामध्ये पातूर येथील १३ संधिग्ध रुग्णांचे ‘स्वॅब’ असून, त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तांत्रिक अडचणीमुळे होत आहे दिरंगाईनागपूर येथील ‘व्हीआरडीएल’लॅबवर विदर्भातील अकराही जिल्ह्यांचा भार आहे. राज्यभरात कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, लॅबमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संधिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल मिळण्यास अडचणी जात आहेत.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

वाशिमनंतर अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच अकोल्यातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही केवळ अफवा असून, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, घरातच सुरक्षीत राहा, असे आवाहन देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस