थंडी ओसरली, हरभरा संकटात विविध किडींचा हल्ला
By Admin | Updated: December 12, 2014 01:26 IST2014-12-11T21:32:44+5:302014-12-12T01:26:29+5:30
खरीप हंगामातील पिके शेतक-यांच्या हातून गेलीत.

थंडी ओसरली, हरभरा संकटात विविध किडींचा हल्ला
अकोला : यावर्षी खरीप हंगामातील पिके शेतकर्यांच्या हातून गेली असून, आता रब्बी हंगामावरही संकट आले आहे. जिल्ह्यातील हरभरा हे रब्बी हंगामात महत्त्वाचे पीक आहे. जिल्ात यावर्षी लाखो हेक्टरवर हरभर्याची पेरणी करण्यात आली; मात्र थंडीच नसल्यामुळे दव पडत नसून, पिकांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.
यावर्षी पावसाळ्यात दोन महिने उशिरा पाऊस झाला. त्यामुळे उडीद व मुगाच्या पिकांची पेरणी करता आली नाही. त्यातच अल्प पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचेही मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकर्यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून अपेक्षा होती. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओल नव्हती. याचा परिणाम रब्बी पिकांवर पडला. शेतकर्यांनी लाखो हेक्टरवर हरभर्याची पेरणी केली. थंडी पडली तर सकाळी वातावरणात दव तयार होते. हे दव झाडांवर पडल्यानंतर त्यातून झाडे पाणी शोषून घेतात. त्यामुळे झाडांना वाढण्यास व फळधारणा करण्यास मदत होते. यावर्षी सुरुवातीपासूनच थंडी कमी पडत आहे. सध्या डिसंेबर महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी पारा ३१ डिग्री सेल्सीअस आहे. त्यात गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. खरीप हंगामात पिके गेल्यावर रब्बी हंगामापासून काही उत्पन्न मिळेल, अशा अपेक्षेने शेती करीत असताना हरभरा पिकाचेही नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
*ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव
गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे थंडी ओसरली आहे. याचा फटका हरभरा पिकाला बसणार आहे. ढगाळ वातावरण किडींना पोषक असल्यामुळे प्रादुर्भावही वाढला आहे. हरभर्यावर सध्या विविध किडींनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्यांना फवारणीसाठी महागड्या औषधांची खरेदी करावी लागत आहे.