शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:00 IST

अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे.

अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे. उद्घाटन उद्या शनिवार ९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष सुगत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.चाइल्ड लाइन १०९८ या प्रकल्पाला भारत सरकारची मान्यता आहे. चाइल्ड लाइनबाबत बाल न्यायलय अधिनियम २०१५ यामध्ये कलम २ (२५) तसेच कलम ३१ (१)(३) मध्ये उल्लेख आहे. हा प्रकल्प तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला या संस्थेद्वारे संपूर्ण अकोला जिल्ह्यात राबविला जाणार आहे. चाइल्ड लाइन १०९८ ही काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाऱ्या मुलांसाठीची २४ तास चालणारी राष्ट्रीय आपत्कालीन मोफत फोन सेवा आहे. महिला व बालविकास केंद्रीय मंत्रालयाचा चाइल्ड लाइनला आधार आहे. चाइल्ड लाइन राज्य सरकार, एनजीओ, अलाईडसिस्टिीम आणि कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेले असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.हरविलेले, सापडलेली, आश्रयाची गरज असणारे, अत्याचारग्रस्त, वैद्यकीय मदतीची गरज असणारे, धोक्याच्या ठिकाणी काम करणारी, अनर्थकारी परिस्थितीत सापडलेली मुले, काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असलेल्या चिमुकल्या मुले व मुलींना चाइल्ड लाइनची मदत होणार आहे. विपरीत परिस्थितीत असलेली बालके आढळल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनला १०९८ या क्रमांकावर फोन लावून बालकाची मदत करू शकतात. अनेक वेळा विपरीत परिस्थितीत उद्भवल्यास पोलिसांचे तत्काळ पोहचणे शक्य नसते. अशा वेळी नागरिकांनी निडर होऊन त्या बालकाची मदत करावी. जर पोलिसात तक्रार केली तर आपल्यावरच पोलीस कारवाई करतील, अशा गैरसमजातून अनेक नागरिक बालकांची मदत करीत नाहीत; परंतु अशा नागरिकांना पोलीस यंत्रणा नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही भय मनात न ठेवता अशा बालकांच्या मदतीसाठी पुढे येऊन १०९८ वर फोन करू न संबंधित यंत्रणेला सजग करावे. अकोल्यात यापूर्वी १०९८ हेल्पलाइन सुरू होती; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही हेल्पलाइन बंद झाली. आता तिक्ष्णगत संस्थेमार्फत ही हेल्पलाइन बालकांच्या कल्याणार्थ सुरू करण्यात आली असून, अविरत राहील, अशी ग्वाही यावेळी संजय सेंगर यांनी दिली. पत्रकार परिषदेला विष्णुदास मुंडोकार, श्रीकांत पिंजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक