शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:12 PM

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

- विजय शिंदे

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु महाराष्ट्रात  इतर राज्यातील जनावरांच्या कळपांनी बेकादेशीरपणे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांकरिता दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.महाराष्ट्रात  गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेश मार्गाने येणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांमुळे पाळीव जनावरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाºया वन्य प्राण्यांमध्ये तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात परप्रांतामधून मोठ्या प्रमाणात जनावरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर आढळून येत आहेत. शेतातील हंगामाची उलंगवाडी झाल्याने शेते चराईकरिता ही जनावरे आली आहेत. यावरून राज्यात प्रवेशावेळी कोणी कायदेशीर अटकाव केल्याचे दिसून येत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यामागे जबाबदारी असलेल्या संबंधिताची मिलीभगत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी जनावरे विकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा परराज्यात चारा पाठविण्यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत शासन आदेशाची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट