शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:58 IST

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गट यावरून आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच एका भाजप नेत्याने याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अजित पवारांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे, असे म्हटले आहे. आता, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे खंदे समर्थक अमोल मिटकरी हेही मैदानात उतरले आहेत. मिटकरी यांनी भाजप आमदारांना थेट चॅलेंजच दिलं आहे.  

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, संभाजी महाराजांनी केवळ हिंदू आणि हिंदू धर्मासाठीच बलिदान केलं असं जर कोणी म्हणत असेल, नवीन जावई शोध लावत असेल तर, भाजपच्या कोणत्याही आमदाराने माझं चॅलेंज स्विकारावं. संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर यासाठी डिबेटमध्ये बसावं. जो कोणी हरेल त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असं चॅलेंजच आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदारांना दिले आहे. 

शिंदे गटाचे आमदार तेव्हा कुठे बिळात तोंड लपवून बसले होते, जेव्हा सावित्रीमाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल राज्यपाल आणि चंद्रकांत पाटील बोलते होते, असा प्रतिप्रश्नच मिटकरी यांनी केला. वारंवार पक्ष बदलणाऱ्या माणसांनी अजित पवारांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो व्यक्ती स्वत:ला धर्मवीर म्हणत असेल त्या व्यक्तीने अजित दादांबद्दल बोलू नये, असे म्हणत आमदार मिटकरी यांनी भाजप आमदारास टोलाही लगावला. 

दरम्यान, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले भाजप आमदार

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली. धर्माकरीता त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच त्यांना जगात धर्मवीर म्हणून मान्यता आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे. अजितदादांनी जे विधान केले, त्याबद्दल खरेतर त्यांची रवानगी पाकिस्तानमध्ये केली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. 

रोहित पवारांचे दिले प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. तुम्ही शब्दांशी खेळत बसू नका. त्यामागची भावना समजून घ्या. राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. तेव्हा तुम्ही शांत का होता? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली. तत्पूर्वी, विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीBJPभाजपा