बहुजन समता आघाडीने दिले धरणे

By Admin | Updated: August 29, 2014 01:43 IST2014-08-29T01:40:06+5:302014-08-29T01:43:38+5:30

अकोला जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करण्याची मागणी.

Brood parity | बहुजन समता आघाडीने दिले धरणे

बहुजन समता आघाडीने दिले धरणे

अकोला : जिल्ह्यातील दलित, आदिवासी भूमिहिनांनी उपजीविका भागविण्यासाठी पडीत व गायरान जमिनीवर शेती प्रयोजनासाठी केले अतिक्रमण नियमाकूल करण्याचे निर्देश देण्यात यावे, या मागणीसाठी मानवी हक्क अभियान बहुजन समता आघाडीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
भूमिहीन अतिक्रमकांचे उत्पन्नाचे साधन म्हणून, त्यांच्या ताब्यात असलेली पडीत व गायरान जमीन नावे करण्यासाठी महसूल विभागाकडे दाखल केलेले प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच वर्गवारी करून आरक्षण देण्यात यावे, समृद्धी योजनेंतर्गत प्रलंबित कर्ज प्रकरणांचा निपटारा करून कर्ज वाटप करण्यात यावे, शासकीय घरकुल योजनेंतर्गत दारिद्रय़ रेषेची गुण पद्धत रद्द करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी मानवी हक्के अभियान बहुजन समता आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. या धरणे आंदोलनात बहुजन समता आघाडीचे जिल्हाध्यक्ष महादेव क्षीरसागर, जयदीप सरकटे, शंकर वारके, गजानन घोडे, सुखदेव घोडे, बाबाराव तायडे, गजानन झाडे, दादाराव दवंडे, पंजाब वाकोडे, प्रल्हाद तायडे, किशोर भोसले, रजनी पवार, धम्मा गवई व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले
होते.

Web Title: Brood parity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.