शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:39 IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते.

अकोला : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत घाई घाईत शपथविधी उरकणे हे अचानक घडलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते. आपण तसा इशाराही दिला होता, अशी प्रतिक्रीया वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.राज्यात सत्ता स्थापनेचा तीढा सुटत असताना आणि महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्यूला निश्चित झाला असतानाच, शनिवारी सकाळीच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. एवढेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही उरकण्यात आला. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, की ही घडामोड अचानक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हाच असे काही तरी होणार याचा आपल्याला अंदाज आला होता. सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो, असा इशाराही आपण दिला होता. परंतु, राजकारणातील चातुर्य कमी पडल्याने त्यांची फसवणूक झाली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यपालांचे काम घटनेला धरून नाहीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सकाळीच उरकण्यात आला. राज्यपालांनी घाईघाईत हा शपथविधी केला. हे काम घटनेला धरून नाही. लोकांना विश्वासात घेऊन शपथविधीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019