शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:39 IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते.

अकोला : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत घाई घाईत शपथविधी उरकणे हे अचानक घडलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते. आपण तसा इशाराही दिला होता, अशी प्रतिक्रीया वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.राज्यात सत्ता स्थापनेचा तीढा सुटत असताना आणि महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्यूला निश्चित झाला असतानाच, शनिवारी सकाळीच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. एवढेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही उरकण्यात आला. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, की ही घडामोड अचानक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हाच असे काही तरी होणार याचा आपल्याला अंदाज आला होता. सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो, असा इशाराही आपण दिला होता. परंतु, राजकारणातील चातुर्य कमी पडल्याने त्यांची फसवणूक झाली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यपालांचे काम घटनेला धरून नाहीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सकाळीच उरकण्यात आला. राज्यपालांनी घाईघाईत हा शपथविधी केला. हे काम घटनेला धरून नाही. लोकांना विश्वासात घेऊन शपथविधीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019