शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

शेतकरी, शेतमजुरांना पेन्शनसाठी भारतीय संग्राम परिषदेचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 6:06 PM

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे.

अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे. भारतीय संग्राम परिषद राज्यभरात शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना शासनाकडून लागू करवून घेण्यासाठी लढा देणार आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा लढल्या जाणार आहे.जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाठया शेतकऱ्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत मातीत राब राब राबवावे लागते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकºयांना अश्रू गाळायला लावतो. तरीही प्रत्येक परिस्थितीत हिंमतआणि धैर्य एकवटून शेतकरी शेती कसत राहतो. एवढे करुनही नशीबी सुखाचे जिवन नसतेच. मुला मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. मुला मुलींचे लग्न जुळविण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत संपूर्ण जीवन घालविल्यानंतर उतार वयात शेतात काम करण्या इतकी शक्ती शेतकरी व शेतमजूरांमधे राहत नाही.त्यामुळेच ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री, पुरुष शेतकरी व शेतमजूरांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी शासनाने अशा शेतकरी व शेतमजुरांसाठी प्रतिमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. यामधे ६० वर्षांपेक्ष अधिक वय असलेल्या शेतकरी व शेत मजुरांकडून रितसर अर्ज भरवून घेतल्या जात आहेत. हे सर्व अर्ज आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सोपविल्या जाणार आहे. या शिवसंग्रामच्या व भारतीय संग्राम परिषदेच्या लढ्यामधे जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांनी सहभागी होवून पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अर्ज भरुन द्यावे, असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीPoliticsराजकारण