शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:23 IST

बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही.

अकोला : अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी जिल्हावासीयांना शांततेचे आवाहन केले आहे. हा निकाल दोन्ही बाजूने समसमान लागला असून कोणाचाही विजय किंवा पराजय या निकालाने झाला नसल्याचे त्यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेतस्पष्ट केले. शाळा महाविद्यालय सुरूच राहणार असून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही. मात्र सण-उत्सव हे परंपरेनुसार साजरे करण्याचे आवाहन अमोघ गावकर यानी केले. दुचाकी रॅली, चार चाकी रॅली तसेच मिरवणूक, महाआरती सार्वजनिकरीत्या फटाके फोडणे, चौकात येऊन मिठाई वाटप करणे, यासारख्या संपूर्ण कार्यक्रमांवर चार ते पाच दिवस  प्रतिबंध करण्यात आले आहेत. मात्र अतिरेक होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा प्रकारचे धार्मिक उत्सव हे परंपरेनुसार कौटुंबिक वातावरनात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी पत्रकार परिषदेतून केले. घरोघरी साजरी होणाऱ्या तुळशी विवाहाचे फटाके फोडायचे असल्यास ते कमी प्रमाणात किंवा न फोडले तरीही चालेल; मात्र असेल तर ते स्वतःच्या घरासमोर फटाके फोडण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले. आयोध्या प्रकरणाचा निकालाचे दोन्ही बाजूने स्वागत करण्यात आले असून कोणीही अफवा किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ ेसेजेस यावर विश्‍वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे मेसेजेस व्हिडिओ किंवा फोटो कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक अमोल गावकर यानी दिला. 

1992 सली झालेल्या दंगलीतील जिल्ह्यात जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर दोन दिवसांपासूनच नजर ठेवण्यात येत आहे. या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ते पोलिसांच्या नजरेत आहेत. -  अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस