शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:44 AM

. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत २२ दिवसांपासून संचारबंदी आहे. या काळात रेल्वे, बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशीच नसल्यामुळे ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. पोलीस वाहतूक शाखेच्या माहितीनुसार शहरात ४ हजारांवर परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर एकही ऑटोरिक्षा धावत नसल्याने, ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. शासनाने २२ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे रेल्वे, बससेवासुद्धा बंद आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, या दृष्टिकोनातून रेल्वे व परिवहन विभागाला सेवा बंद ठेवाव्या लागत आहेत.रेल्वे स्थानक, बसस्थानकावर प्रवासी नसल्यामुळे आणि नागरिकांचे बाहेर पडणे बंद असल्याने, ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. एक ऑटोरिक्षा चालकाला दररोज ५00 ते ८00 रुपये रोजगार मिळायचा. यातून मुलांचेशिक्षण, घरखर्च भागायचा; परंतु आता हा रोजगारच बुडाला असल्याने आणि उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, याची चिंता आॅटोरिक्षा चालकांना सतावत आहे. कोरोनामुळे ऑटोरिक्षा चालकांना चांगलाच फटका बसला आहे. गत २२ दिवसांपासून घरांसमोर आॅटोरिक्षा उभ्या आहेत. घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी आबाळ होत आहे. अशा संकटकाळात करावे काय, असा प्रश्न आॅटोरिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने परवानाधारक आॅटोरिक्षा चालकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आॅटोरिक्षा चालकांनी केली आहे.  

शाळा बंद तर ऑटो बंद!अकोला शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सातशेच्यावर आॅटोरिक्षा चालक आहेत; परंतु शाळा, महाविद्यालयांना अचानक सुट्या देण्यात आल्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांसमोरसुद्धा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व चालकांचे  ऑटो घरासमोर उभे राहिल्याने महिन्याकाठी ८ ते १0 हजार रुपये येणारा रोजगार बंद झाला आहे.कोरोनाच्या संचारबंदीमुळे आम्हा ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याचा प्रश्न आहे. ४ हजारांवर कुटुंबांचा ऑटोरिक्षाच्या भरवशावर संसार चालतो. पैसाच नसल्यामुळे घर कसे चालवावे, याची चिंता आहे. यातून प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा.-उमेशचंद्र शर्मा,अध्यक्ष, शहर ऑटोरिक्षा चालक संघटना.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस