शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

शुभस्ते पंथे शीघ्रम्

By admin | Updated: December 29, 2014 01:59 IST

नागरी सत्कारात पालकमंत्र्यांकडून अकोलेकरांची अपेक्षा.

अकोला : अकोल्याला अनेक वर्षांपासून चातकासारखी विकासाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे संपली आहे. पाटील यांच्या माध्यमातून आता अकोल्याच्या विकासाचा अनुशेष निश्‍चितच भरून निघणार आहे. आता ह्यशुभस्ते पंथ शीघ्रम्ह्ण या न्यायाने अकोल्याचा विकास होईल, अशी अपेक्षा अकोलेकरांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्कारात व्यक्त केली. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. नानासाहेब चौधरी होते. यावेळी मंचावर मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आमदार गोपीकिसन बाजोरिया, हरीश पिंपळे, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, डॉ. अर्पणा पाटील, माजी आमदार विठ्ठलराव पाटील, विजय जाधव, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अजय तापडिया, बंडू देशमुख, मुकेश मुरुमकार, तरुण बगेरे, डॉ. किशोर मालोकार, गोपाल खंडेलवाल, अँड. मोतीसिंह मोहता, गोपाल खंडेलवाल, नगरसेवक गजानन गवई आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री रणजित पाटील यांचा सत्कार डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या हस्ते डॉ. अपर्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हारतुर्‍याचा खर्च बाजूला सारून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १२ लाख १७ हजार ७१0 रुपयंचा निधी डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आला. प्रास्ताविक गोपाल खंडेलवाल यांनी केले. मानपत्राचे वाचन अशोक ढेरे यांनी केले. संचालन डॉ. गजानन नारे यांनी केले. *विकासपर्वाला साथ देणार्‍यांना सोबत घेऊ - पाटील माझ्याकडे येणार्‍या पेशंटला बरं करण्यासाठी मला त्यांचे दु:ख समजून घ्यावे लागले. आता मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. मला आता समाजाची परीक्षा द्यायची आाणि त्यासाठी समाजाचे दु:ख मला समजून घ्यावे लागेल. प्रत्येकाचे दु:ख समजून घेण्यासाठी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी यापुढील काळात करणार आहे, असे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने मी या पदावर पोहोचलो आहे. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे मला सर्वांचेच हित जोपासणे गरजेचे आहे; परंतु पालकमंत्री या नात्याने अकोला व वाशिम या जिल्ह्याला निश्‍चितच झुकते माप राहील. अकोल्याच्या मातीनेच मला संवेदनशीलता, सहृदयता, मानवता, प्रेम शिकविले आहे. माझी नाळ शेतकर्‍यांशी जुळली आहे; ती कधीच तुटणार नाही हा विश्‍वास ठेवा. आमच्या विकासपर्वात जो साथ देईल, त्याला सोबत घेऊन व जो देणार नाही, त्याला बाजूला सारुन आता पुढे जाणार, असे पाटील यांनी सांगितले.